मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटीबद्ध, जरांगे पाटलांचे आभार : मुख्यमंत्री

मुंबई : सरकार प्रामाणिकपणे गांभीर्याने मराठा आरक्षण देण्याच्या संदर्भात काम करत असल्याचे तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. चर्चेतून कोणताही प्रश्न सुटू शकतो, त्यातून मार्ग काढता येतो. आज मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आभार मानले. ही इतिहासातील पहिली घटना आहे की कायदेतज्ज्ञ उपोषणस्थळी चर्चेसाठी गेले, असे मुख्यमंत्री म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली.


कायद्याच्या चौकटीत बसणार आणि टिकणारं आरक्षण देण्यास सरकार कटीबद्ध आहे. प्रत्येक जिल्ह्यात 10 जण मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात काम करतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. आरक्षण देण्यासंदर्भातील निर्णय हा टिकणारा असला पाहिजे. शिंदे समितीनं देखील दिवस रात्र काम केलं आहे. आणखी काही कुणबी नोंदी सापडतील असे त्यांनी सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


उच्च न्यायालयात आरक्षण टिकण्यासंदर्भात ज्यांनी ज्यांनी काम केले त्यांचे देखील आम्ही सहकार्य घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. काल झालेल्या बैठकीत आम्ही सगळ्यांनी ठरवलं की, चर्चेतून प्रश्न सुटु शकतो, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

Crime News :सोलापूरातील धक्कादायक घटना;बहिनीच्या पतीलाच...हॅाटेलमध्ये जेवायला बोलवलं अन्

सोलापूर : बहिणीने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यामुळे या गोष्टीचा राग मनात ठेवून आपल्याच बहिणीच्या पतीला

Maharashtra Goverment On Government Aircraft And Helicopters : राज्य सरकारचा मोठा निर्णय: सरकारी विमानांच्या देखभालीचा 'प्लॅन' तयार; 'जीआर' मध्ये काय?

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी विमानांच्या आणि हेलिकॉप्टर्सच्या तातडीच्या कामांसाठी मोठा निधी

शरद पवारांना आणखी एक धक्का; पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने अजितदादा यांच्यानंतर आपल्या अजून एका मोठ्या नेत्याला गमावले आहे. पुण्याचे माजी

Ajit Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धडाडीच्या आणि शिस्तप्रिय पर्वाचा गुरुवार २९ जानेवारी रोजी बारामतीच्या मातीत

मद्यधुंध वाहनचालकाची धडक अन् ३० ते ४० विद्यार्थ्यांचे जीव टांगणीला

पुणे : हल्ली वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्यामुळे अनेक रस्ते अपघाताच्या घटना या घडत आहे. असाच एक धक्कादायक आणि

Republic Day 2026 : प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ देशात सर्वोत्कृष्ट

नवी दिल्ली, २९ : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडलेल्या दिमाखदार