Ajit Pawar : अजित पवार आजारी असल्याने दौंडमधील मोळीपूजन करणार कोण? राष्ट्रवादीने घेतला 'हा' निर्णय

  146

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोणत्याही शासकीय वा सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. यासंबंधी खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी ट्विट करत अजितदादांनी डेंग्यूची लागण झाली असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे दौंडमधील आज होणार्‍या मोळीपूजनालाही ते उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे मोळीपूजनासाठी राष्ट्रवादीकडून (NCP) एक निर्णय घेण्यात आला आहे.


बारामतीतील दौंड तालुक्यातील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या अजित पवारांच्या खासगी मालकीच्या असलेल्या साखर कारखान्याचे मोळीपूजन आज होणार आहे. पण अजितदादांना डेंग्यूची लागण झाल्याने हे मोळीपूजन कोणाच्या हस्ते होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानुसार आता अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या हस्ते हे मोळीपूजन होणार आहे.


दरम्यान, मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना आणि पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक गावात पुढाऱ्यांना येण्यास विरोध केला जात आहे. अनेक ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात येत आहेत. त्यामुळे दौंडमध्ये मोळीपूजनासाठी अजितदादांनाही मराठा क्रांती मोर्चाकडून विरोध करण्यात आला. मराठे आणखी आक्रमक होऊ नयेत यासाठी देखील अजितदादा या पूजनाला जाणार नसल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या