Ajit Pawar : अजित पवार आजारी असल्याने दौंडमधील मोळीपूजन करणार कोण? राष्ट्रवादीने घेतला 'हा' निर्णय

  137

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोणत्याही शासकीय वा सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. यासंबंधी खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी ट्विट करत अजितदादांनी डेंग्यूची लागण झाली असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे दौंडमधील आज होणार्‍या मोळीपूजनालाही ते उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे मोळीपूजनासाठी राष्ट्रवादीकडून (NCP) एक निर्णय घेण्यात आला आहे.


बारामतीतील दौंड तालुक्यातील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या अजित पवारांच्या खासगी मालकीच्या असलेल्या साखर कारखान्याचे मोळीपूजन आज होणार आहे. पण अजितदादांना डेंग्यूची लागण झाल्याने हे मोळीपूजन कोणाच्या हस्ते होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानुसार आता अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या हस्ते हे मोळीपूजन होणार आहे.


दरम्यान, मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना आणि पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक गावात पुढाऱ्यांना येण्यास विरोध केला जात आहे. अनेक ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात येत आहेत. त्यामुळे दौंडमध्ये मोळीपूजनासाठी अजितदादांनाही मराठा क्रांती मोर्चाकडून विरोध करण्यात आला. मराठे आणखी आक्रमक होऊ नयेत यासाठी देखील अजितदादा या पूजनाला जाणार नसल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली