Ajit Pawar : अजित पवार आजारी असल्याने दौंडमधील मोळीपूजन करणार कोण? राष्ट्रवादीने घेतला 'हा' निर्णय

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोणत्याही शासकीय वा सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. यासंबंधी खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी ट्विट करत अजितदादांनी डेंग्यूची लागण झाली असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे दौंडमधील आज होणार्‍या मोळीपूजनालाही ते उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे मोळीपूजनासाठी राष्ट्रवादीकडून (NCP) एक निर्णय घेण्यात आला आहे.


बारामतीतील दौंड तालुक्यातील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या अजित पवारांच्या खासगी मालकीच्या असलेल्या साखर कारखान्याचे मोळीपूजन आज होणार आहे. पण अजितदादांना डेंग्यूची लागण झाल्याने हे मोळीपूजन कोणाच्या हस्ते होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानुसार आता अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या हस्ते हे मोळीपूजन होणार आहे.


दरम्यान, मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना आणि पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक गावात पुढाऱ्यांना येण्यास विरोध केला जात आहे. अनेक ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात येत आहेत. त्यामुळे दौंडमध्ये मोळीपूजनासाठी अजितदादांनाही मराठा क्रांती मोर्चाकडून विरोध करण्यात आला. मराठे आणखी आक्रमक होऊ नयेत यासाठी देखील अजितदादा या पूजनाला जाणार नसल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

फलटण महिला डॉक्टर प्रकरण, हॉटेल रूममधल्या 'त्या' शेवटच्या क्षणांचं CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; डॉक्टरच्या आत्महत्येमागे नेमकं काय घडलं?

फलटण : महाराष्ट्रातील फलटण शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण राज्यात

पोलिसांनी तरुणीसह आरोपींच्या फोनचे CDR काढले, हाती आली 'ही' माहिती

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येचा तपास पोलीस करत

कार्तिकी एकादशीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे, जाणून घ्या वेळापत्रक

सोलापूर: वारकऱ्यांसाठी कार्तिकी एकादशी महत्त्वाची असते. याच पंढरपूरच्या कार्तिकी

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या