LPG Price Hike: ऐन सणासुदीच्या काळात महागाईचा जोरदार झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात १०३ रूपयांची वाढ

नवी दिल्ली: देशात सणासुदीच्या काळात लोकांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. आज देशात सर्वत्र करवा चौथचा सण साजरा केला जात आहे. तसेच आजपासूनच एलपीजी सिलेंडरच्या(LPG gas cylinder) दरात १०० रूपयांहून अधिक वाढ झाली आहे.


व्यवसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मात्र याचा परिणाम खाण्या-पिण्याची इंडस्ट्री तसेच रेस्टॉरंट व्यवसायावर पाहायला मिळू शकतो. यामुळे बाहेरचे खाणे-पिणे मात्र महाग होणार आहे. जाणून घ्या ऑईल मार्केटिंग कंपननी एलपीजी सिलेंडरचे दर किती वाढवले.



दिल्लीत व्यवसायिक सिलेंडरच्या दरात १०१.५ रूपयांची वाढ


आज एक नोव्हेंबरपासून दिल्लीत व्यवसायिक एलपीजी सिलेंडरचे दर वाढन १८३३ रूपये प्रति सिलेंडर झाले आहेत. ऑक्टोबर महिन्यात हे दर १७३१.५० रूपये होते. दिल्लीत व्यवसायिक एलपीजीचे दर १०१.५० रूपयांनी वाढले आहेत.



जाणून घ्या आपल्या शहारातील दर


कोलकातामध्ये व्यवसायिक सिलेंडरचे दर १०३.५० रूपयांनी वाढले आहेत आणि आता हे दर १९४३ रूपयांवर पोहोचले आहेत. तर गेल्या महिन्यात याचा दर १८३९.५० रूपये होते.


देशाची आर्थिक राजधानी मुंबईत व्यवसायिक गॅस सिलेंडरचे दर १७८५.५० रूपये आहेत आणि हे दर १०१.५० रूपयांनी वाढले आहेत. ऑक्टोबरमध्ये याचा दर १६८४ इतका होता.


चेन्नईत गॅस सिलेंडरचे दर १९९९.५० रूपयांवर आले आहेत. हे दर १०१.५० रूपयांनी वाढले आहेत. ऑक्टोबरमध्ये हे दर १८९८ रूपये होते.

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे