Maratha Aarakshan : मराठा आरक्षणावर मार्ग निघणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणार...

मुख्यमंत्री व जरांगे यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा


जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालन्यातील आंतरवाली सराटी जावात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यांनी पाणी व उपचार त्यागल्यामुळे मराठा आंदोलक काल प्रचंड आक्रमक झाले. अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेक करण्यात आली. थेट आमदार प्रकाश सोळंकेंचेही घर जाळण्यात आले. शिवाय जालन्यात उपस्थित असलेले मराठा बांधव मनोज जरांगेंनी पाणी प्याव या हट्टाला पेटले होते. त्यांच्या विनंतीचा मान राखत काल जरांगेंनी तीन ते चार घोट पाणी प्राशन केलं. परंतु जगांगेंची प्रकृती अधिकच खालावत चालल्यामुळे त्यांनी उपोषणादरम्यान पाणी प्यावं असा आग्रह मराठा बांधवांनी केला. त्यांच्या आग्रहाचा मान राखत मनोज जरांगेंनी आजपासून पाणी पिण्याचा निर्णय घेतला आहे.


मनोज जरांगेंच्या पाणी पिण्यामागे आणखी एक कारण असल्याची चर्चा आहे. आज सकाळी मनोज जरांगे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात फोनवर तब्बल अर्धा तास चर्चा झाली. यात जरांगेंनी पुन्हा एकदा आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या. ही चर्चा सकारात्मक झाली असल्याची चिन्हे आहेत. या संभाषणातर जरांगे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यामुळे यात ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.



राज्य सरकार आरक्षणासाठी प्रयत्नशील


महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी सोमवारी रात्री उशिरापर्यंत राज्य सरकारच्या हालचाली सुरू होत्या. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कोअर कमिटीची बैठक घेतली. या बैठकीनंतर ओबीसी नेते छगन भुजबळ व प्रकाश शेंडगे हेही सागर बंगल्यावर दाखल झाले. पाऊण तासाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दाखल झाले. वर्षावरील कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या बैठकीनंतर शिंदे व फडणवीस यांच्यात बंदद्वार चर्चा झाली. तर आज शिवसेना आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांनी वर्षावर बोलवली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या देखील मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी वेगाने हालचाली सुरु आहेत.

Comments
Add Comment

Satara Murder: कराडमध्ये शासकीय अभियंत्याची हत्या; सुपारी देऊन रचला कट, जवळच्या नातेवाईकांना अटक

सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड (Karad) शहरात एका शासकीय अभियंत्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. या

MPSC EXAM : MPSC परीक्षार्थींसाठी महत्त्वाचे! आता परीक्षा केंद्रावर दीड तास आधी पोहोचणे अनिवार्य; नवीन नियमावली जाहीर

NAGPUR: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या शिस्तपालनासाठी आयोगाने कडक पावले उचलली

 Solapur Crime News: धक्कादायक! सोलापुरात 5 वर्षीय पुतण्याची काकाकडून हत्या, आरोपीवर गुन्हा दाखल

सोलापूर: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरूर गावात एक मन सुन्न

Nagpur Conversion Case : नागपूरच्या दर्ग्यात महिलेचा विनयभंग आणि धर्मांतरासाठी सक्ती; ६ जणांवर गुन्हा

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील एका दर्ग्यात घडलेल्या कथित सक्तीच्या धर्मांतराच्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली

MSME : MSME उद्योजकांसाठी मोफत हेल्पलाईन सुरू; एका कॉलवर मिळणार तज्ज्ञ मार्गदर्शन

मुंबई : राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक मार्गदर्शन, माहिती आणि तज्ज्ञ

Mumbai Crime : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये संतापजनक प्रकार, तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक

मुंबईतून (Mumbai) एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करताना एका तरुणीचा विनयभंग (Molestation)