Lalit Patil Drugs case : ड्रगमाफिया ललित पाटीलचा ताबा आता पुणे पोलिसांकडे

  83

ललितला मात्र पुणे पोलिसांची भीती; केले गंभीर आरोप


पुणे : ड्रग्जमाफिया ललित पाटील (Lalit Patil) पुण्यातील ससून रुग्णालयातून (Sassoon Hospital) फरार झाल्यानंतर साधारण दोन आठवडे पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. अखेर साकीनाका पोलिसांच्या कारवाईला यश आलं आणि ललितला चेन्नईमधून अटक करण्यात आली. त्यानंतर मात्र या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. यासंबंधी अधिक चौकशी करण्यासाठी तो फरार झाल्यापासून त्याच्या मागावर असलेल्या पुणे पोलिसांना (Pune Police) त्याचा ताबा हवा होता. अखेर न्यायालयाने परवानगी दिली असून ललित पाटील आता पुणे पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.


पुणे पोलीस लवकरच ललित पाटीलचा ताबा घेणार आहेत. ललित पाटीलसह शिवाजी शिंदे आणि चौधरी नावाच्या आरोपीचा ताबा पुणे पोलिसांना मिळाला आहे. पुणे पोलिसांचा तपास हा ललित पाटीलच्या चौकशीपर्यंत येऊन थांबला आहे. आतापर्यंत ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांनी काहींना अटक केली आहे आणि त्यासोबतच ससूनचादेखील तपास सुरु आहे. मात्र हा तपास पुढे नेण्यासाठी ललित पाटीलचा ताबा पुणे पोलिसांना मिळणं गरजेचं होते.


तर दुसरीकडे ललित पाटीलने पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत."मला पुणे पोलिसांकडून धोका आहे. त्यांनी मला मारहाण केली होती. पुणे पोलिसांच्या मारहाणीमुळे बरगडी आणि कानामध्ये जखम झाली आहे," असं तो कोर्टात म्हणाला होता. तरी देखील न्यायालयाने त्याचा ताबा पुणे पोलिसांना दिला आहे.



अनेक गोष्टी येणार समोर


ललितला अटक झाल्यानंतर ससून रुग्णालयातून मी पळालो नसून मला पळवण्यात आलं होतं, असा दावा त्याने केला होता. त्यानंतर तो अनेक दिवस नाशिकमध्येच होता. नाशिकहून इंदोरला, तिथून सूरत आणि पुन्हा नाशिक, धुळे, औरंगाबाद करत त्याने कर्नाटकात प्रवेश केला. बंगळूरवरून चेन्नईला जात असताना साकीनाका पोलिसांनी ललित पाटीलला अटक केली. त्यामुळे या सगळ्या प्रवासात त्याला कोणाची साथ मिळाली होती? तो पळून जाण्यात इतका यशस्वी कसा झाला? असे प्रश्न उपस्थित झाले होते. अनेक राजकारण्यांचेही संबंध या प्रकरणाशी जोडण्यात आले. त्यातच आता पुणे पोलिसांच्या ललित तावडीत सापडल्याने आणखी काही गोष्टींचा उलगडा होणार आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या