मराठा आरक्षण आंदोलन पेटले, भातकुडगाव फाट्यावर दोन तास रास्ता रोको आंदोलन

  105

शेवगाव (प्रतिनिधी) - नेवासा राजमार्गावरील भातकुडगाव फाटा चौफुल्यावर चालू असलेल्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. चार दिवस उलटून गेले तरीही वैद्यकीय अधिकाऱ्यांना तहसील कार्यालयाकडून कुठलेही लेखी स्वरूपात पत्र न दिल्याने आमरण उपोषणास बसलेल्या भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव व जोहरापूरचे माजी सरपंच अशोक देवढे व साखळी उपोषणात सहभागी असलेले कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे, भायगावचे माजी सरपंच अशोक दुकळे, प्रहारचे तालुका अध्यक्ष रामजी शिदोरे, भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर, भगवान आढाव, मराठा महासंघाचे अनिल सुपेकर, शेतकरी बचावचे एकनाथ काळे यांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी तहसील कार्यालयाकडून चार दिवस झाले तरी कुठल्याही प्रकारचे लेखी पत्र न दिल्याने विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करा व उपोषणास बसलेल्यांना वैद्यकीय मदत द्या अशा घोषणा देत.


या घटनेचा निषेध करत सकल मराठा समाजाच्या वतीने भातकुडगाव फाटा चौफुल्यावर तब्बल दोन तास रस्ता रोको करून निषेध करण्यात आला. यावेळी तहसीलदार राहुल गुरव यांनी मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेला सामोरे जाऊन या कामे कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल. व यापुढील भातकुडगाव आरोग्य केंद्राला आपण लगेच लेखी दिले. असल्याची माहिती आक्रमक झालेल्या सकल मराठा समाजाला दिल्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला.


रस्ता रोको वेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष रामजी शिदोरे, शेतकरी संघटनेचे मच्छिंद्र आर्ले, शिक्षक बँकेचे काकासाहेब घुले, मराठा महासंघाचे अनिल सुपेकर, तुकाराम शिंगटे, भाजपाचे विलासराव फाटके अविनाश महाराज लोखंडे यावेळी सकल मराठा समाजातील अनेक मान्यवरांसह विद्यार्थी सहभागी झाले होते. आदींनी आपल्या भाषणातून शासनाचा निषेध केला.यावेळी शेवगाव पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या