मराठा आरक्षण आंदोलन पेटले, भातकुडगाव फाट्यावर दोन तास रास्ता रोको आंदोलन

शेवगाव (प्रतिनिधी) - नेवासा राजमार्गावरील भातकुडगाव फाटा चौफुल्यावर चालू असलेल्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. चार दिवस उलटून गेले तरीही वैद्यकीय अधिकाऱ्यांना तहसील कार्यालयाकडून कुठलेही लेखी स्वरूपात पत्र न दिल्याने आमरण उपोषणास बसलेल्या भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव व जोहरापूरचे माजी सरपंच अशोक देवढे व साखळी उपोषणात सहभागी असलेले कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे, भायगावचे माजी सरपंच अशोक दुकळे, प्रहारचे तालुका अध्यक्ष रामजी शिदोरे, भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर, भगवान आढाव, मराठा महासंघाचे अनिल सुपेकर, शेतकरी बचावचे एकनाथ काळे यांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी तहसील कार्यालयाकडून चार दिवस झाले तरी कुठल्याही प्रकारचे लेखी पत्र न दिल्याने विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करा व उपोषणास बसलेल्यांना वैद्यकीय मदत द्या अशा घोषणा देत.


या घटनेचा निषेध करत सकल मराठा समाजाच्या वतीने भातकुडगाव फाटा चौफुल्यावर तब्बल दोन तास रस्ता रोको करून निषेध करण्यात आला. यावेळी तहसीलदार राहुल गुरव यांनी मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेला सामोरे जाऊन या कामे कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल. व यापुढील भातकुडगाव आरोग्य केंद्राला आपण लगेच लेखी दिले. असल्याची माहिती आक्रमक झालेल्या सकल मराठा समाजाला दिल्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला.


रस्ता रोको वेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष रामजी शिदोरे, शेतकरी संघटनेचे मच्छिंद्र आर्ले, शिक्षक बँकेचे काकासाहेब घुले, मराठा महासंघाचे अनिल सुपेकर, तुकाराम शिंगटे, भाजपाचे विलासराव फाटके अविनाश महाराज लोखंडे यावेळी सकल मराठा समाजातील अनेक मान्यवरांसह विद्यार्थी सहभागी झाले होते. आदींनी आपल्या भाषणातून शासनाचा निषेध केला.यावेळी शेवगाव पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे