Majalgaon Nagarparishad burnt : मराठा आंदोलकांनी माजलगाव नगरपरिषद पेटवली!

  317

आमदारांच्या घरानंतर आता बीडमधील नगरपरिषदेतून आगीचे लोट


बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी आज सकाळच्या सुमारास राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक करत आग लावली. यानंतर आता दुपारी बीडमध्येच माजलगाव येथील नगरपरिषद कार्यालय पेटवून दिले आहे. आरक्षणाची मागणी करत आलेल्या जमावाने माजलगाव नगर परिषदेमध्ये घुसून जाळपोळ सुरू केली. त्यामुळे नगरपरिषदेच्या इमारतीमध्ये मोठी आग लागली आहे.


आमदारांच्या घरी जाळपोळ केल्यानंतर तेच आंदोलक आरक्षणाची मागणी करत नगरपरिषदेपर्यंत पोहोचले. नगरपरिषदेच्या आगीची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या माजलगाव परिसरात तणावाचे वातावरण आहे.



बीड जिल्ह्यामध्ये परळी-बीड त्यासोबतच धुळे-सोलापूर आणि त्यानंतर आता कल्याण विशाखापटनम महामार्गावर सुद्धा आंदोलन करत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कल्याण विशाखापटनम महामार्गावर तालखेड फाटा येथे मराठा समाजाच्या आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केला. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


एकीकडे मराठा आंदोलक शांततेच्या मार्गाने आंदोलन करतात अशी चर्चा होत असतानाच, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ते प्रचंड आक्रमक होऊ शकतात, हे दाखवायला त्यांनी सुरुवात केली आहे. लागोपाठ जाळपोळीच्या घटना वाढत चालल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत