Maratha Aarkshan : मराठा आरक्षणाबाबत होणार मोठा निर्णय; मुख्यमंत्री आज जाणार जरांगेंच्या भेटीला...

सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरु


मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Aarkshan) मुद्दा प्रचंड तापला असून ठिकठिकाणी त्याचे पडसाद उमटत आहेत. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांनी पाणी व उपचार घेणे टाळल्याने त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. यामुळे सरकारच्या हालचालींनाही वेग आला आहे.


मराठा आरक्षणासंदर्भात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसिमितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे, कारण यानंतर मुख्यमंत्री जरांगेंची भेट घेण्याकरता थेट जालन्यात अंतरवाली सराटी येथे दाखल होणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.


मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू आहे. कुणबी नोंदणी आढळणाऱ्यांना आरक्षण देण्यात येण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनाच आरक्षण दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून त्यांनी नियोजित केलेल्या समितीच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे.


बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करणार आहेत, तर मुख्यमंत्री जरांगेंच्या भेटीसाठी रवाना होणार आहेत. बैठकीनंतर चंद्रकांत पाटील मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. हा निर्णय नेमका काय असेल याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना