Maratha Aarkshan : मराठा आरक्षणाबाबत होणार मोठा निर्णय; मुख्यमंत्री आज जाणार जरांगेंच्या भेटीला...

सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरु


मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Aarkshan) मुद्दा प्रचंड तापला असून ठिकठिकाणी त्याचे पडसाद उमटत आहेत. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांनी पाणी व उपचार घेणे टाळल्याने त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. यामुळे सरकारच्या हालचालींनाही वेग आला आहे.


मराठा आरक्षणासंदर्भात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसिमितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे, कारण यानंतर मुख्यमंत्री जरांगेंची भेट घेण्याकरता थेट जालन्यात अंतरवाली सराटी येथे दाखल होणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.


मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू आहे. कुणबी नोंदणी आढळणाऱ्यांना आरक्षण देण्यात येण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनाच आरक्षण दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून त्यांनी नियोजित केलेल्या समितीच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे.


बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करणार आहेत, तर मुख्यमंत्री जरांगेंच्या भेटीसाठी रवाना होणार आहेत. बैठकीनंतर चंद्रकांत पाटील मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. हा निर्णय नेमका काय असेल याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये