Maratha Aarkshan : मराठा आरक्षणाबाबत होणार मोठा निर्णय; मुख्यमंत्री आज जाणार जरांगेंच्या भेटीला...

  177

सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरु


मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Aarkshan) मुद्दा प्रचंड तापला असून ठिकठिकाणी त्याचे पडसाद उमटत आहेत. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांनी पाणी व उपचार घेणे टाळल्याने त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. यामुळे सरकारच्या हालचालींनाही वेग आला आहे.


मराठा आरक्षणासंदर्भात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसिमितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे, कारण यानंतर मुख्यमंत्री जरांगेंची भेट घेण्याकरता थेट जालन्यात अंतरवाली सराटी येथे दाखल होणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.


मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू आहे. कुणबी नोंदणी आढळणाऱ्यांना आरक्षण देण्यात येण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनाच आरक्षण दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून त्यांनी नियोजित केलेल्या समितीच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे.


बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करणार आहेत, तर मुख्यमंत्री जरांगेंच्या भेटीसाठी रवाना होणार आहेत. बैठकीनंतर चंद्रकांत पाटील मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. हा निर्णय नेमका काय असेल याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत