खेळाडू, कायदेतज्ञ, कलाकारांचे लाच विरोधी अभियान , शर्मिला वालावलकर यांची आयडियाची कल्पना

नाशिक (प्रतिनिधी) - नाशिक परीक्षेत्र लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी पदभार स्विकारल्यानंतर प्रशासनातील लाचखोरीला चांगलाच पायबंध घालण्याची मोहीम छेडली आहे. साधारण वर्षभराच्या कालखंडात शर्मिष्ठा वालावलकर यांनी लाच खोर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नाकात वेसण घालताना तब्बल दिड शतक पुर्ण केले असल्याने मुघल सरदारांच्या घोडयांना पाणी पितानाही संताजी धनाजी दिसायचे तसे प्रशासनातील लाचखोरांना आणि त्यांच्या दलालांना शर्मिष्ठा वालावलकर आणि त्यांचे पथक दिसू लागले आहेत.


दीडशेच्या आसपास सापळे यशस्वी होऊन देखील आडमार्गाने लाच खोरी सुरूच असल्याची बाब वालावलकर यांच्या लक्षात आल्यानंतर जन जागृतीचा उपक्रम राबविण्याचा संकल्प त्यांनी सोडला. समाजाचे मन परिवर्तन केल्या शिवाय ही लाचखोरी थांबणार नाही हे हेरून समाज ज्यांचे अनुकरण करतो, ज्यांना समाजात आदराचे स्थान आहे असे खेळाडू, कायदे तज्ज्ञ, कलाकारांची मदत घेऊन त्यांनी लाच देणे आणि घेणे कायद्याने गंभीर गुन्हा असल्याने समाजाने त्यापासून परावृत्त व्हावे असे आवाहन केले आहे.


इच्छाशक्ती प्रामाणिक असेल तर आपोआप मार्ग सापडतो याचेच हे उदाहरण. अभिजित खांडकेकर, चिन्मय उदगिरकर, विद्या करंजीकर, किरण भालेराव, प्रार्थना बेहरे हे चित्रपट कलाकार, कब्बडी पटू आकाश शिंदे, विशेष सरकारी वकील अजय मिसर, ऍड नितीन ठाकरे, हिवरगावचे सरपंच पोपटराव पवार आदींनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक