खेळाडू, कायदेतज्ञ, कलाकारांचे लाच विरोधी अभियान , शर्मिला वालावलकर यांची आयडियाची कल्पना

नाशिक (प्रतिनिधी) - नाशिक परीक्षेत्र लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी पदभार स्विकारल्यानंतर प्रशासनातील लाचखोरीला चांगलाच पायबंध घालण्याची मोहीम छेडली आहे. साधारण वर्षभराच्या कालखंडात शर्मिष्ठा वालावलकर यांनी लाच खोर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नाकात वेसण घालताना तब्बल दिड शतक पुर्ण केले असल्याने मुघल सरदारांच्या घोडयांना पाणी पितानाही संताजी धनाजी दिसायचे तसे प्रशासनातील लाचखोरांना आणि त्यांच्या दलालांना शर्मिष्ठा वालावलकर आणि त्यांचे पथक दिसू लागले आहेत.


दीडशेच्या आसपास सापळे यशस्वी होऊन देखील आडमार्गाने लाच खोरी सुरूच असल्याची बाब वालावलकर यांच्या लक्षात आल्यानंतर जन जागृतीचा उपक्रम राबविण्याचा संकल्प त्यांनी सोडला. समाजाचे मन परिवर्तन केल्या शिवाय ही लाचखोरी थांबणार नाही हे हेरून समाज ज्यांचे अनुकरण करतो, ज्यांना समाजात आदराचे स्थान आहे असे खेळाडू, कायदे तज्ज्ञ, कलाकारांची मदत घेऊन त्यांनी लाच देणे आणि घेणे कायद्याने गंभीर गुन्हा असल्याने समाजाने त्यापासून परावृत्त व्हावे असे आवाहन केले आहे.


इच्छाशक्ती प्रामाणिक असेल तर आपोआप मार्ग सापडतो याचेच हे उदाहरण. अभिजित खांडकेकर, चिन्मय उदगिरकर, विद्या करंजीकर, किरण भालेराव, प्रार्थना बेहरे हे चित्रपट कलाकार, कब्बडी पटू आकाश शिंदे, विशेष सरकारी वकील अजय मिसर, ऍड नितीन ठाकरे, हिवरगावचे सरपंच पोपटराव पवार आदींनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे.

Comments
Add Comment

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे