खेळाडू, कायदेतज्ञ, कलाकारांचे लाच विरोधी अभियान , शर्मिला वालावलकर यांची आयडियाची कल्पना

नाशिक (प्रतिनिधी) - नाशिक परीक्षेत्र लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी पदभार स्विकारल्यानंतर प्रशासनातील लाचखोरीला चांगलाच पायबंध घालण्याची मोहीम छेडली आहे. साधारण वर्षभराच्या कालखंडात शर्मिष्ठा वालावलकर यांनी लाच खोर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नाकात वेसण घालताना तब्बल दिड शतक पुर्ण केले असल्याने मुघल सरदारांच्या घोडयांना पाणी पितानाही संताजी धनाजी दिसायचे तसे प्रशासनातील लाचखोरांना आणि त्यांच्या दलालांना शर्मिष्ठा वालावलकर आणि त्यांचे पथक दिसू लागले आहेत.


दीडशेच्या आसपास सापळे यशस्वी होऊन देखील आडमार्गाने लाच खोरी सुरूच असल्याची बाब वालावलकर यांच्या लक्षात आल्यानंतर जन जागृतीचा उपक्रम राबविण्याचा संकल्प त्यांनी सोडला. समाजाचे मन परिवर्तन केल्या शिवाय ही लाचखोरी थांबणार नाही हे हेरून समाज ज्यांचे अनुकरण करतो, ज्यांना समाजात आदराचे स्थान आहे असे खेळाडू, कायदे तज्ज्ञ, कलाकारांची मदत घेऊन त्यांनी लाच देणे आणि घेणे कायद्याने गंभीर गुन्हा असल्याने समाजाने त्यापासून परावृत्त व्हावे असे आवाहन केले आहे.


इच्छाशक्ती प्रामाणिक असेल तर आपोआप मार्ग सापडतो याचेच हे उदाहरण. अभिजित खांडकेकर, चिन्मय उदगिरकर, विद्या करंजीकर, किरण भालेराव, प्रार्थना बेहरे हे चित्रपट कलाकार, कब्बडी पटू आकाश शिंदे, विशेष सरकारी वकील अजय मिसर, ऍड नितीन ठाकरे, हिवरगावचे सरपंच पोपटराव पवार आदींनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे