Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तरुणाने सर्वांसमक्ष संपवले जीवन

जरांगे यांच्याशी बोलण्याची व्यक्त केली होती इच्छा


बीड : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा आता वेगळेच रुप धारण करु लागला असून यामध्ये अनेक तरुण आपला जीव गमावत आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर मराठा आंदोलनात उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरु केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. यावर आता सरकारने आंदोलन गांभीर्याने घ्यावे, अन्यथा हजारोंच्या संख्येने लोक उपोषण करतील, असं विधान त्यांनी केलं आहे. दरम्यान, काल रात्रीच बीडमधील (Beed News) एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आपलं जीवन संपवल्याची (Suicide case) धक्कादायक घटना घडली आहे.


बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील गिरवली येथील एका तरुणाने मराठा आरक्षण देण्याची मागणी करत, पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केली. यावेळेस तेथील उपस्थितांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला न जुमानता त्याने अखेर उडी मारुन आपलं जीवन संपवलं. काल रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. शत्रुघ्न काशीद असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.


मराठा आरक्षण देण्याची मागणी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ शत्रुघ्न गुरुवारी रात्री पाण्याच्या टाकीवर चढला होता. तिथे काही काळ शत्रुघ्न याने आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली. तसेच जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याची इच्छाही व्यक्त केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते ताबडतोब हजर झाले व शत्रुघ्नची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मागणीवर ठाम राहिला. अखेर त्याने रात्रीच्या सुमारास टाकीवरून उडी मारली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनाला ग्रहणाचा सावट नाही, पण सकाळचा मुहूर्त चुकला ? जाणून घ्या दुपारी राखी कधी बांधायची!

आज २८ ऑगस्ट रोजी देशभरात भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि पवित्र नात्याचा 'रक्षाबंधन' हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी