Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तरुणाने सर्वांसमक्ष संपवले जीवन

जरांगे यांच्याशी बोलण्याची व्यक्त केली होती इच्छा


बीड : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा आता वेगळेच रुप धारण करु लागला असून यामध्ये अनेक तरुण आपला जीव गमावत आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर मराठा आंदोलनात उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरु केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. यावर आता सरकारने आंदोलन गांभीर्याने घ्यावे, अन्यथा हजारोंच्या संख्येने लोक उपोषण करतील, असं विधान त्यांनी केलं आहे. दरम्यान, काल रात्रीच बीडमधील (Beed News) एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आपलं जीवन संपवल्याची (Suicide case) धक्कादायक घटना घडली आहे.


बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील गिरवली येथील एका तरुणाने मराठा आरक्षण देण्याची मागणी करत, पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केली. यावेळेस तेथील उपस्थितांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला न जुमानता त्याने अखेर उडी मारुन आपलं जीवन संपवलं. काल रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. शत्रुघ्न काशीद असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.


मराठा आरक्षण देण्याची मागणी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ शत्रुघ्न गुरुवारी रात्री पाण्याच्या टाकीवर चढला होता. तिथे काही काळ शत्रुघ्न याने आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली. तसेच जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याची इच्छाही व्यक्त केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते ताबडतोब हजर झाले व शत्रुघ्नची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मागणीवर ठाम राहिला. अखेर त्याने रात्रीच्या सुमारास टाकीवरून उडी मारली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन

Jalgaon : जळगाव-गोवा विमानसेवा फुल्ल; १५ जुलैपर्यंत ८०% तिकिटे हाऊसफुल

Jalgaon : पावसाळा सुरू होताच पर्यटनप्रेमींचा मोर्चा गोव्याकडे वळला असून, जळगावहून गोव्यासाठी सुरू असलेल्या

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे