Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तरुणाने सर्वांसमक्ष संपवले जीवन

जरांगे यांच्याशी बोलण्याची व्यक्त केली होती इच्छा


बीड : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा आता वेगळेच रुप धारण करु लागला असून यामध्ये अनेक तरुण आपला जीव गमावत आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर मराठा आंदोलनात उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरु केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. यावर आता सरकारने आंदोलन गांभीर्याने घ्यावे, अन्यथा हजारोंच्या संख्येने लोक उपोषण करतील, असं विधान त्यांनी केलं आहे. दरम्यान, काल रात्रीच बीडमधील (Beed News) एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आपलं जीवन संपवल्याची (Suicide case) धक्कादायक घटना घडली आहे.


बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील गिरवली येथील एका तरुणाने मराठा आरक्षण देण्याची मागणी करत, पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केली. यावेळेस तेथील उपस्थितांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला न जुमानता त्याने अखेर उडी मारुन आपलं जीवन संपवलं. काल रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. शत्रुघ्न काशीद असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.


मराठा आरक्षण देण्याची मागणी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ शत्रुघ्न गुरुवारी रात्री पाण्याच्या टाकीवर चढला होता. तिथे काही काळ शत्रुघ्न याने आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली. तसेच जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याची इच्छाही व्यक्त केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते ताबडतोब हजर झाले व शत्रुघ्नची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मागणीवर ठाम राहिला. अखेर त्याने रात्रीच्या सुमारास टाकीवरून उडी मारली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

अमरावतीत सलग २५ तासांत १५ हजार ७७३ डोसे !

विख्यात शेफ विष्णू मनोहर यांचा विक्रम अमरावती : विख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी अमरावती शहरात सलग २५ तासांत एकूण

घोडबंदर रोडवर भीषण अपघात; एका महिलेचा जागीच मृत्यू, दुचाकीचालक गंभीर जखमी

ठाणे : घोडबंदर वाहिनीवरील विजय गार्डन स्काय वॉक ब्रिजखाली, रविवार रात्री

प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये ५१ टक्के मतांचा संकल्प करा - बावनकुळे

नागपूर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक सर्कल मध्ये ५१ टक्के मते मिळतील असा संकल्प करा, असे आवाहन

मुंबईसह विविध ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

ठाणे : मुंबईतील वाकोला प्रभाग क्रमांक ९१ चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक सगुण नाईक त्यांची कन्या युवासेना कॉलेज कक्ष

पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू, अपघाताने २३ वाघांचा मृत्यू

चंद्रपूर : मागील पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात नैसर्गिक मृत्यू असले तरी,

शनिवार वाड्यावर नमाज पठण, निषेधासाठी भाजपच्या नेतृत्वात हिंदुत्ववाद्यांचे आंदोलन

पुणे : शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून