Onion Price : कांद्याच्या दरात वाढ पण कांदा आहे कुठे? शेतकर्‍यांचं दुःख काही संपेना...

सामान्यांच्याही खिशाला कात्री


मुंबई : कांदा उत्पादक शेतकर्‍यांना (Onion farmers) दिलासा देणारी एक बाब समोर आली होती, मात्र त्या बाबीमुळेही शेतकर्‍यांचा त्रास काही केल्या संपत नाही. मागच्या काही महिन्यांत टोमॅटोचे (Tomato) भाव खूप वाढल्यानंतर आता कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. कांद्याचा दर नेहमीपेक्षा बराच वाढला असून शेतकर्‍यांसाठी फायदेशीर आहे. मात्र, कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडे आता फारच कमी कांदा शिल्लक असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचं दुःख अजूनही कायम आहे.


ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा होता, त्यावेळी त्याला दर नव्हता. आता शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नसताना कांद्याच्या दराला झळाळी आली आहे. कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी कांद्याचे भाव वाढतील या आशेने कांदे विकले. मात्र, आता भाव वाढल्यानंतर कांदेच शिल्लक राहिले नाहीत. जो माल उरला तो बर्‍यापैकी सडत आला आहे, त्यामुळे भाव मिळत असला तरी कांदे आणायचे कुठून या प्रश्नाने शेतकर्‍यांचा मनस्ताप वाढला आहे.


दरम्यान, कांद्याला सरासरी ४ हजार ८०० ते जास्तीत जास्त ५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. कांद्याला चांगला दर मिळत असताना शेतकऱ्यांकडे मात्र, विक्रीसाठी कांदा शिल्लक नाही. त्यामुळे बाजार समितीत कांद्याची आवक पूर्णपणे घटली आहे. तसेच देशांतर्गत पुरवठा होत नसल्याने तिकडे मागणी वाढल्याने कांद्याच्या दरात वाढ होत आहे. उन्हाळी कांदा संपून लाल कांद्याला बाजारात यायला अजून एक महिना अवकाश असल्याने पुढील काही दिवस कांद्याचे दर हे चढेच राहणार आहेत.



सामान्यांच्या खिशाला कात्री


आठवडाभरापूर्वी कांदा ३० ते ४० रुपयांनी मिळत असताना दिल्लीच्या किरकोळ बाजारात कांद्याचे दर हे ५० ते ६० रुपये किलो इतके वाढले आहेत. आठवडाभरात कांद्याच्या दरात ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. दरम्यान, डिसेंबरमध्ये नवीन पीक येण्यापूर्वी महागड्या कांद्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता दिसत नाही. पुढील काही दिवस कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाची उघडीप कायम; 'या' तारखेनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून २१ जुलैनंतर पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता; जुलैअखेर चांगल्या पावसाचा अंदाज राज्यात पुन्हा एकदा

Ashadhi Wari 2026 : वारीत वाटण्यासाठी आणलेल्या शीतपेयामुळे २ परिचारिकांना विषबाधा; अन्न व औषध प्रशासनाची तातडीची कारवाई

धाराशिव : धाराशिवमध्ये शेगावच्या संत गजानन महाराजांच्या वारीदरम्यान मोठी दुर्घटना टळली आहे. भाविकांना

Ashadhi Wari 2026 : पालखी सोहळ्यात चोरांचा धुमाकूळ! ६७ महिला, २२ पुरुषांसह ८९ संशयित पोलिसांच्या ताब्यात

पुणे : श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात (Palkhi Procession) लाखो वारकरी

Mumbai Crime : संतापजनक! मुंबईत सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार, संतप्त नागरिकांचा रस्ता रोको आंदोलन

मुंबई : मुंबई (Mumbai) येथील पायधुनी परिसरात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका ७ वर्षांच्या

Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले

ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने  ठाणे  : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद

Sunetra pawar : संत ज्ञानेश्वर माऊली'च्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार; वारकऱ्यांसोबत भोजनाचा घेतला

पुणे - सासवड, दि. १२ जुलै - अखंड हरिनामाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती