BCCIने सुरू केली आयपीएल २०२४ची तयारी, लिलावाची तारीख आली समोर

  106

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) १७व्या भागाची तयारी सुरू केली आहे. बीसीसीआय आयपीएलसह महिला प्रीमियर लीगचीही (WPL) रूपरेषा तयार करत आहे. अशातच बातमी आहे की आयपीएल आणि डब्लूपीएलच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव डिसेंबरमध्ये होऊ शकतो.


आयपीएल २०२४साठीचा खेळाडूंचा लिलावा परदेशात होण्याची आशा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ खेळाडूंच्या लिलावाचे आयोजन १५ ते १९ डिसेंबरदरम्यान करू शकतो. वेबसाईट क्रिकबझच्या बातमीनुसार, आयपीएल २०२४साठी खेळाडूंचा लिलाव दुबईत आयोजित केला जाऊ शकतो. बीसीसीआय महिला खेळाडूंच्या लिलावाचे आयोजन देशात ९ डिसेंबरला करू शकतो.



फ्रेंचायझीला अधिकृत सूचना नाही


भारतीय मंडळाने लिलावाबाबत फ्रेंचायझीला अद्याप कोणतीही अधिकृत सूचना दिलेली नाही. गेल्या वर्षी बीसीसीआयने आयपीएलच्या १६व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलावा इस्तांबुलमध्ये करण्याचा विचार केला होत. मात्र त्यानंतर त्याचे आयोजन कोचीमध्ये करण्यात आले. यामुळे दुबईमध्ये लिलावाची योजना अस्थायी असू शकते. दरम्यान,सर्व आयपीएल संघांना लिलावाचे ठिकाण म्हणून दुबईचा विचार करण्यासाठी सांगण्यात आले आहे.



फेब्रुवारीमध्ये होऊ सकते डब्लूपीएलचे आयोजन


महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाचे आयोजन फेब्रुवारीमध्ये होऊ शकते. दरम्यान, मंडळाकडून आतापर्यंत फ्रेंचायझी टीमना लिलावाची तारीख आणि ठिकाणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भारतीय महिला क्रिकेट संघ जानेवारीच्या मध्यापर्यंत आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्यात बिझी असेल. गेल्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन मुंबईत झाले होते.

Comments
Add Comment

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट