BCCIने सुरू केली आयपीएल २०२४ची तयारी, लिलावाची तारीख आली समोर

Share

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) १७व्या भागाची तयारी सुरू केली आहे. बीसीसीआय आयपीएलसह महिला प्रीमियर लीगचीही (WPL) रूपरेषा तयार करत आहे. अशातच बातमी आहे की आयपीएल आणि डब्लूपीएलच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव डिसेंबरमध्ये होऊ शकतो.

आयपीएल २०२४साठीचा खेळाडूंचा लिलावा परदेशात होण्याची आशा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ खेळाडूंच्या लिलावाचे आयोजन १५ ते १९ डिसेंबरदरम्यान करू शकतो. वेबसाईट क्रिकबझच्या बातमीनुसार, आयपीएल २०२४साठी खेळाडूंचा लिलाव दुबईत आयोजित केला जाऊ शकतो. बीसीसीआय महिला खेळाडूंच्या लिलावाचे आयोजन देशात ९ डिसेंबरला करू शकतो.

फ्रेंचायझीला अधिकृत सूचना नाही

भारतीय मंडळाने लिलावाबाबत फ्रेंचायझीला अद्याप कोणतीही अधिकृत सूचना दिलेली नाही. गेल्या वर्षी बीसीसीआयने आयपीएलच्या १६व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलावा इस्तांबुलमध्ये करण्याचा विचार केला होत. मात्र त्यानंतर त्याचे आयोजन कोचीमध्ये करण्यात आले. यामुळे दुबईमध्ये लिलावाची योजना अस्थायी असू शकते. दरम्यान,सर्व आयपीएल संघांना लिलावाचे ठिकाण म्हणून दुबईचा विचार करण्यासाठी सांगण्यात आले आहे.

फेब्रुवारीमध्ये होऊ सकते डब्लूपीएलचे आयोजन

महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाचे आयोजन फेब्रुवारीमध्ये होऊ शकते. दरम्यान, मंडळाकडून आतापर्यंत फ्रेंचायझी टीमना लिलावाची तारीख आणि ठिकाणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भारतीय महिला क्रिकेट संघ जानेवारीच्या मध्यापर्यंत आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्यात बिझी असेल. गेल्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन मुंबईत झाले होते.

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

47 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

1 hour ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

2 hours ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

2 hours ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

2 hours ago