Mumbai Pollution : मुंबईतील प्रदूषणाला आदित्य ठाकरेच जबाबदार!

आपलीच पाठ आणि आपलंच खाजवणार्‍यांनी मुंबईला काय करुन दाखवलं?


भाजप आमदार आशिष शेलार यांचा आरोप


मुंबई : मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांत प्रदूषणाचे (Mumbai Pollution) प्रमाण प्रचंड वाढले असून हवेची गुणवत्ता (Air Quality) फारच खालावली आहे. मुंबईमध्ये सुरु असलेले अनेक बांधकामांचे प्रकल्प, वाहनांच्या संख्येत झालेली वाढ यांमुळे मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी थेट उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पर्यावरण मंत्री असताना त्यांनी मंजूर केलेल्या प्रकल्पांमुळेच मुंबईकरांना हे दिवस पाहावे लागत आहेत, अशी जळजळीत टीका आशिष शेलार यांनी केली आहे.


आशिष शेलार म्हणाले, मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता ढासळत चालली आहे, प्रदूषण वाढत चाललं आहे. आज मुंबईकर जो त्रास आणि यातना भोगतो आहे, त्याला सर्वस्वी जबाबदार तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांना मी धन्यवाद देईन की त्यांनी आज या विषयावर स्वतः काही पावलं उचलली. पण विषय असा आहे की, आरेला जंगल घोषित केलं म्हणून आपलीच पाठ आणि आपलंच खाजवणारे किंवा वाजवणारे यांनी मुंबईला काय करुन दाखवलं? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला.


पुढे ते म्हणाले, प्रत्यक्षात आदित्यजी तुम्ही काय केलं? दहा वर्षांमध्ये मुंबईतील ३० ते ३८ हजारांच्या वर झाडं तोडण्याची परवानगी तुम्ही दिली. कोविडच्या काळात व्यावसायिकांना, बिल्डर्सना प्रीमियम भरण्यात ५० टक्के सूट देण्यात आली. या ५० टक्के माफीमुळे सर्व बिल्डर्सनी पटापट अॅग्रीमेंट करुन, परवानग्या, प्लॅन अप्रूव्हल करुन घेतले. दरवर्षी मंजूर होणार्‍या प्लॅन वा आराखड्यांपेक्षा दुप्पट आणि तिपटीने आराखडे मंजूर झाले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून प्रत्यक्षात तिप्पट बांधकामाला सुरुवात झाली, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी