Sadavarte car case : मराठ्यांना बदनाम करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या आदेशानेच फोडली सदावर्तेंची गाडी

भाजप आमदार नितेश राणे यांचा आरोप; केली चौकशीची मागणी


मुंबई : मराठा आरक्षणाविरोधात (Maratha Reservation) याचिका दाखल करुन आरक्षण रद्द करणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Lawyer Gunaratna Sadavarte) यांच्या गाडीची आज परळ येथील त्यांच्या राहत्या घरासमोर तोडफोड करण्यात आली. तोडफोड केल्याप्रकरणी मंगेश साबळे, वसंत बनसोडे, राजू सावे या तीन आरोपींना भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघेही मराठा समाजाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप सदावर्तेंनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एक गौप्यस्फोट करत उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचाच हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप केला आहे. तसेच त्यांच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.


नितेश राणे म्हणाले, जी मुलं काल मातोश्रीच्या बाहेर फिरताना दिसत होती तीच आज सकाळी वकील गुणरत्न सदावर्तेंची गाडी फोडताना दिसली. त्यामुळे त्या मुलांच्या कॉल रेकॉर्डिंग्जची तपासणी करण्यात यावी. त्यांच्या टॉवर लोकेशनची तपासणी व्हायला हवी. काल अगर ही मुलं मातोश्रीवर उपस्थित होती आणि आज ती गाडी तोडताना दिसत असतील तर गाडी तोडताना त्या ठिकाणी कॅमेरामॅन कसे उपस्थित असू शकतात? म्हणजे हा पूर्वनियोजित कट होता का? असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.


पुढे ते म्हणाले, एका बाजूला मनोज जरांगे सातत्याने आवाहन करत आहेत की आपण शांततापूर्ण आंदोलन करायचं आहे आणि त्याच पद्धतीने मराठा समाज प्रत्येक गावात शांततेने आंदोलन करतो आहे. मराठ्यांनी ५८ मोर्चे काढले पण एकाच्याही केसाला धक्का लावला नाही. त्यांच्या प्रत्येक मोर्च्यामध्ये बाजूने अॅम्ब्युलन्स जात असेल, तर तिला लगेच वाट करुन दिली जायची. याच मराठा समाजाला बदनाम करण्याचा कार्यक्रम मातोश्रीवर शिजतोय का? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.


नितेश राणे पुढे म्हणाले, सातत्याने २४ ऑक्टोबरनंतर दंगली होऊ शकतात, असं कोण म्हणतं? तर ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत. आम्ही वारंवार सांगतो की महाराष्ट्रात दंगली घडवण्यामागे उद्धव ठाकरे यांचा मोठा हात आहे. मीरा बोरवणकरांनी आपल्या पुस्तकातही याचा उल्लेख केला आहे. आजच्या घटनेमुळे हे पुन्हा सिद्धदेखील झालं आहे. त्यामुळे आज गाडी तोडणारे कार्यकर्ते काल मातोश्रीवर काय करत होते, याचा तपास झालाच पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा

BMC Election 2026 : बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि