Sadavarte car case : मराठ्यांना बदनाम करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या आदेशानेच फोडली सदावर्तेंची गाडी

  137

भाजप आमदार नितेश राणे यांचा आरोप; केली चौकशीची मागणी


मुंबई : मराठा आरक्षणाविरोधात (Maratha Reservation) याचिका दाखल करुन आरक्षण रद्द करणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Lawyer Gunaratna Sadavarte) यांच्या गाडीची आज परळ येथील त्यांच्या राहत्या घरासमोर तोडफोड करण्यात आली. तोडफोड केल्याप्रकरणी मंगेश साबळे, वसंत बनसोडे, राजू सावे या तीन आरोपींना भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघेही मराठा समाजाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप सदावर्तेंनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एक गौप्यस्फोट करत उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचाच हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप केला आहे. तसेच त्यांच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.


नितेश राणे म्हणाले, जी मुलं काल मातोश्रीच्या बाहेर फिरताना दिसत होती तीच आज सकाळी वकील गुणरत्न सदावर्तेंची गाडी फोडताना दिसली. त्यामुळे त्या मुलांच्या कॉल रेकॉर्डिंग्जची तपासणी करण्यात यावी. त्यांच्या टॉवर लोकेशनची तपासणी व्हायला हवी. काल अगर ही मुलं मातोश्रीवर उपस्थित होती आणि आज ती गाडी तोडताना दिसत असतील तर गाडी तोडताना त्या ठिकाणी कॅमेरामॅन कसे उपस्थित असू शकतात? म्हणजे हा पूर्वनियोजित कट होता का? असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.


पुढे ते म्हणाले, एका बाजूला मनोज जरांगे सातत्याने आवाहन करत आहेत की आपण शांततापूर्ण आंदोलन करायचं आहे आणि त्याच पद्धतीने मराठा समाज प्रत्येक गावात शांततेने आंदोलन करतो आहे. मराठ्यांनी ५८ मोर्चे काढले पण एकाच्याही केसाला धक्का लावला नाही. त्यांच्या प्रत्येक मोर्च्यामध्ये बाजूने अॅम्ब्युलन्स जात असेल, तर तिला लगेच वाट करुन दिली जायची. याच मराठा समाजाला बदनाम करण्याचा कार्यक्रम मातोश्रीवर शिजतोय का? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.


नितेश राणे पुढे म्हणाले, सातत्याने २४ ऑक्टोबरनंतर दंगली होऊ शकतात, असं कोण म्हणतं? तर ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत. आम्ही वारंवार सांगतो की महाराष्ट्रात दंगली घडवण्यामागे उद्धव ठाकरे यांचा मोठा हात आहे. मीरा बोरवणकरांनी आपल्या पुस्तकातही याचा उल्लेख केला आहे. आजच्या घटनेमुळे हे पुन्हा सिद्धदेखील झालं आहे. त्यामुळे आज गाडी तोडणारे कार्यकर्ते काल मातोश्रीवर काय करत होते, याचा तपास झालाच पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई