Sadavarte car case : मराठ्यांना बदनाम करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या आदेशानेच फोडली सदावर्तेंची गाडी

  136

भाजप आमदार नितेश राणे यांचा आरोप; केली चौकशीची मागणी


मुंबई : मराठा आरक्षणाविरोधात (Maratha Reservation) याचिका दाखल करुन आरक्षण रद्द करणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Lawyer Gunaratna Sadavarte) यांच्या गाडीची आज परळ येथील त्यांच्या राहत्या घरासमोर तोडफोड करण्यात आली. तोडफोड केल्याप्रकरणी मंगेश साबळे, वसंत बनसोडे, राजू सावे या तीन आरोपींना भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघेही मराठा समाजाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप सदावर्तेंनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एक गौप्यस्फोट करत उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचाच हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप केला आहे. तसेच त्यांच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.


नितेश राणे म्हणाले, जी मुलं काल मातोश्रीच्या बाहेर फिरताना दिसत होती तीच आज सकाळी वकील गुणरत्न सदावर्तेंची गाडी फोडताना दिसली. त्यामुळे त्या मुलांच्या कॉल रेकॉर्डिंग्जची तपासणी करण्यात यावी. त्यांच्या टॉवर लोकेशनची तपासणी व्हायला हवी. काल अगर ही मुलं मातोश्रीवर उपस्थित होती आणि आज ती गाडी तोडताना दिसत असतील तर गाडी तोडताना त्या ठिकाणी कॅमेरामॅन कसे उपस्थित असू शकतात? म्हणजे हा पूर्वनियोजित कट होता का? असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.


पुढे ते म्हणाले, एका बाजूला मनोज जरांगे सातत्याने आवाहन करत आहेत की आपण शांततापूर्ण आंदोलन करायचं आहे आणि त्याच पद्धतीने मराठा समाज प्रत्येक गावात शांततेने आंदोलन करतो आहे. मराठ्यांनी ५८ मोर्चे काढले पण एकाच्याही केसाला धक्का लावला नाही. त्यांच्या प्रत्येक मोर्च्यामध्ये बाजूने अॅम्ब्युलन्स जात असेल, तर तिला लगेच वाट करुन दिली जायची. याच मराठा समाजाला बदनाम करण्याचा कार्यक्रम मातोश्रीवर शिजतोय का? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.


नितेश राणे पुढे म्हणाले, सातत्याने २४ ऑक्टोबरनंतर दंगली होऊ शकतात, असं कोण म्हणतं? तर ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत. आम्ही वारंवार सांगतो की महाराष्ट्रात दंगली घडवण्यामागे उद्धव ठाकरे यांचा मोठा हात आहे. मीरा बोरवणकरांनी आपल्या पुस्तकातही याचा उल्लेख केला आहे. आजच्या घटनेमुळे हे पुन्हा सिद्धदेखील झालं आहे. त्यामुळे आज गाडी तोडणारे कार्यकर्ते काल मातोश्रीवर काय करत होते, याचा तपास झालाच पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.