जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते बालिकांचा सन्मान

जिल्हा शासकीय रूग्णालयात ‘स्त्री जन्माचे’ आनोखे स्वागत


नाशिक (प्रतिनिधी)- जिल्हा शासकीय रूग्णालय नाशिक येथे 23 ऑक्टोबरला नवरात्र उत्सवात अष्ठमीच्या दिवशी रात्री बारा वाजेनंतर ज्या मुलींनी जन्म घेतला, त्या मुलींच्या आई, वडील आणि नवजात बालिकांचा सन्मान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली आहे.


या सोहळ्यास अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद चौधरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सुर्यवंशी, स्त्रीरोग तज्ञ विभाग प्रमुख पदव्युत्तर महाविद्यालय डॉ. किरण पाटोळे, डॉ. उत्कर्ष दुधाडीया, डॉ.रोहन बोरसे, डॉ.प्रतीक भांगरे, डॉ.बाळू पाटील, मेट्रेन शुभांगी वाघ, ॲङ सुर्वणा शेफाळ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. राहुल हाडपे, जिल्हा रूग्णालयातील अधिकारी, नर्सिंग स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते.


स्त्री जन्माचे स्वागत सन्मानाने व्हावे यासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयातील पी.सी.पी.एन.टी.डी कार्यक्रमांतर्गत दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो. यावेळी ४ मातांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रसूती कक्ष रांगोळी, तोरण, फुगे लावून सजविण्यात आला होता. नवजात बालिकांच्या मातांना साडी, ओटी भरण करून औक्षण करण्यात आले.


नवजात बालिकांना नवीन कपडे व त्यांच्या वडीलांना शाल देवून सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जन्म झालेल्या पालकांना शुभेच्छा देवून स्त्री जन्माचे स्वागत आनंदाने करण्याचे आवाहन याप्रसंगी केले.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच