मुंबई: रिटायरमेंटनंतर जास्त पैशांची आवश्यकता असते. महिन्याला मिळणारा पगार बंद झाल्यानंतर रोजचा खर्च मॅनेज करणे कठीण होते. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. दरम्यान, आता तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही.जर तुम्हाला दर महिन्याला लाखो रूपयांची पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला काही पैसे गुंतवावे लागतील.
केंद्र सरकारने नॅशनल पेन्शन स्कीमची सुरूवात केली आहे. या योजनेनुसार तुम्ही एका महिन्याला एक लाख रूपयांपर्यंत पेन्शन मिळवू शकता. यात सरकारी कर्मचाऱ्यापासून ते खासगी कर्मचारी कोणीही गुंतवणूक करू शकतात. एनपीएसच्या अंतर्गत १८ ते ७० वर्षांचे नागरिक गुंतवणूक करू शकतात.
रिटायरमेंटचे वय जवळ आल्यावर लोक गुंतवणुकीसाठी त्रस्त होतात. तसेच ही गुंतवणूक कुठे करावी याबाबत विचार करू लागतात. नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये तुम्ही ७० वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता. दरम्यान, तुम्हाला जितके लवकर शक्य असेल तितके लवकर गुंतवणूक सुरू करू शकता. तितकेच फायदेही अधिक होतात. नॅशनल पेन्शन स्कीम १ जानेवारी २००४मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यानंतर २००९मध्ये खाजगी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात आली होती.
जर तुम्ही दर महिन्याला १० हजार रूपये ३० वर्षांपर्यंत गुंतवाल तर महिन्याला १ लाख रूपये पेन्शन मिळू शकते. तर रिटायरमेंटला १ कोटी रूपये एकरकमी मिळू शकतात. या योजनेत इक्विटी एक्सपोजर ५० ते ७५ टक्के आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…