NPS: रिटायरमेंटनंतरही पैशांचे नो टेन्शन! असे करा प्लानिंग, दर महिन्याला मिळतील १ लाख रूपये

मुंबई: रिटायरमेंटनंतर जास्त पैशांची आवश्यकता असते. महिन्याला मिळणारा पगार बंद झाल्यानंतर रोजचा खर्च मॅनेज करणे कठीण होते. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. दरम्यान, आता तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही.जर तुम्हाला दर महिन्याला लाखो रूपयांची पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला काही पैसे गुंतवावे लागतील.


केंद्र सरकारने नॅशनल पेन्शन स्कीमची सुरूवात केली आहे. या योजनेनुसार तुम्ही एका महिन्याला एक लाख रूपयांपर्यंत पेन्शन मिळवू शकता. यात सरकारी कर्मचाऱ्यापासून ते खासगी कर्मचारी कोणीही गुंतवणूक करू शकतात. एनपीएसच्या अंतर्गत १८ ते ७० वर्षांचे नागरिक गुंतवणूक करू शकतात.



रिटायरमेंटचा चांगला पर्याय


रिटायरमेंटचे वय जवळ आल्यावर लोक गुंतवणुकीसाठी त्रस्त होतात. तसेच ही गुंतवणूक कुठे करावी याबाबत विचार करू लागतात. नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये तुम्ही ७० वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता. दरम्यान, तुम्हाला जितके लवकर शक्य असेल तितके लवकर गुंतवणूक सुरू करू शकता. तितकेच फायदेही अधिक होतात. नॅशनल पेन्शन स्कीम १ जानेवारी २००४मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यानंतर २००९मध्ये खाजगी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात आली होती.



एक लाख रूपये पेन्शनसाठी किती करावी लागेल गुंतवणूक


जर तुम्ही दर महिन्याला १० हजार रूपये ३० वर्षांपर्यंत गुंतवाल तर महिन्याला १ लाख रूपये पेन्शन मिळू शकते. तर रिटायरमेंटला १ कोटी रूपये एकरकमी मिळू शकतात. या योजनेत इक्विटी एक्सपोजर ५० ते ७५ टक्के आहे.

Comments
Add Comment

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे

मिठी नदी, नालेसफाईच्या कामांबाबत गैरप्रकार झाल्यास थेट कारवाई; महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला इशारा

मुंबई: नालेसफाईच्या संपूर्ण प्रक्रियेवर अभियंत्यांचे वैयक्तिक लक्ष असणे आवश्यक आहे. तसेच नालेसफाईच्या