Palghar Drugs Factory : राज्यात पसरलंय ड्रग्जचं जाळं? आता पालघरमध्येही सापडला ड्रग्जचा कारखाना

इतकी गुप्त कारवाई की स्थानिक पोलिसांनाही कल्पना दिली नव्हती...


पालघर : गेल्या काही दिवसांपासून राज्याच ड्रग्ज घोटाळ्याची (Drugs case) प्रचंड चर्चा आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झालेला ललित पाटील (Lalit Patil) पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर ड्रगजबाबत कारवाईला वेग आला असून आता राज्यभरात असलेल्या छुप्या ड्रग्जच्या कारखान्यांचा (Drugs Factory) उलगडा होत आहे. कालच मुंबई पोलिसांनी (Mumbai police) नाशिक (Nashik) येथे असलेल्या ललित पाटीलच्या ड्रग्ज कारखान्यावर कारवाई करत झाडाझडती घेतली. सोलापूर, नाशिक, संभाजीनगर या जिल्ह्यांत यापूर्वी ड्रग्ज कारखाने आढळून आले होते. यानंतर आता धक्कादायक बाब म्हणजे पालघर (Palghar) जिल्ह्यातही ड्रग्ज कारखाना आढळून आला आहे. यामुळे पालघर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.


पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात ड्रग्जचा कारखाना असल्याची माहिती मिराभाईंदर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर मिराभाईंदर गुन्हे शाखेकडून पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अत्यंत गुप्तपणे आणि सावधगिरी बाळगत ही कारवाई केली गेली. ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चा माल देखील या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आला आहे. राज्यात अशा प्रकारे होणाऱ्या सलग कारवाईंमुळे ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत.


मोखाडा तालुक्यातील एका फार्म हाऊसवर हा कारखाना चालू होता. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जप्त केल्याची माहिती आहे. तसेच या संदर्भातील आरोपीला वसईमधून अटक करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक पोलिसांना याबाबत काहीच माहिती नव्हती. अशा कारवाईमुळे राज्यात अंमली पदार्थ विकणार्‍या टोळीचे कंबरडे मोडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू