Palghar Drugs Factory : राज्यात पसरलंय ड्रग्जचं जाळं? आता पालघरमध्येही सापडला ड्रग्जचा कारखाना

  167

इतकी गुप्त कारवाई की स्थानिक पोलिसांनाही कल्पना दिली नव्हती...


पालघर : गेल्या काही दिवसांपासून राज्याच ड्रग्ज घोटाळ्याची (Drugs case) प्रचंड चर्चा आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झालेला ललित पाटील (Lalit Patil) पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर ड्रगजबाबत कारवाईला वेग आला असून आता राज्यभरात असलेल्या छुप्या ड्रग्जच्या कारखान्यांचा (Drugs Factory) उलगडा होत आहे. कालच मुंबई पोलिसांनी (Mumbai police) नाशिक (Nashik) येथे असलेल्या ललित पाटीलच्या ड्रग्ज कारखान्यावर कारवाई करत झाडाझडती घेतली. सोलापूर, नाशिक, संभाजीनगर या जिल्ह्यांत यापूर्वी ड्रग्ज कारखाने आढळून आले होते. यानंतर आता धक्कादायक बाब म्हणजे पालघर (Palghar) जिल्ह्यातही ड्रग्ज कारखाना आढळून आला आहे. यामुळे पालघर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.


पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात ड्रग्जचा कारखाना असल्याची माहिती मिराभाईंदर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर मिराभाईंदर गुन्हे शाखेकडून पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अत्यंत गुप्तपणे आणि सावधगिरी बाळगत ही कारवाई केली गेली. ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चा माल देखील या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आला आहे. राज्यात अशा प्रकारे होणाऱ्या सलग कारवाईंमुळे ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत.


मोखाडा तालुक्यातील एका फार्म हाऊसवर हा कारखाना चालू होता. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जप्त केल्याची माहिती आहे. तसेच या संदर्भातील आरोपीला वसईमधून अटक करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक पोलिसांना याबाबत काहीच माहिती नव्हती. अशा कारवाईमुळे राज्यात अंमली पदार्थ विकणार्‍या टोळीचे कंबरडे मोडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या