Heart attack : गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने २६ वर्षीय तरूणाचा मृत्यू

गांधीनगर: गुजरातच्या(gujrat) सुरत शहरात एका तरूणाला गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका(heart attack) आला. यानंतर तो गरबा खेळण्याच्या पंडालमध्ये चक्कर येऊन पडला. त्याला तातडीने अॅम्ब्युल्सद्वारे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


रोहित राठोड शहराजवळील बोनंद गावाच्या डुंगरी मोहल्ले येथे राहत होता. रविवारी रात्री घरासमोरील गरबा पंडालमध्ये तो गरबा खेळत होता. याच दरम्यान तो पंडालमध्ये चक्कर येऊन पडला. घरच्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी सरकारी रुग्णालयात नेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.



डॉक्टरांचे शब्द ऐकताच घरच्यांवर कोसळला दु:खाचा डोंगर


डॉक्टरांवी रोहितला मृत घोषित करताच त्याच्या घरच्यांवर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या मोठ्या भावाने प्रवीणने सांगितले की गावात सगळे गरबा खेळत होते. यातच त्याचा भाऊ गरबा खेळता खेळता खाली पडला. त्याला उपचारासाठी पलसाना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.



रोहितला कोणताही आजार नव्हता, तो शेती करत होता


रोहितला कोणताही आजार नव्हता. त्याची पत्नी आणि त्याला एक मुलगी आहे. तो शेती करत होता. गेल्या २१ तारखेला गुजरातमध्येच गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली हती. २४ तासांत गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची ही १०वी घटना होती.

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी