Bishan Singh Bedi : भारताचे माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचं निधन

वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


मुंबई : डावखुरे फिरकी गोलंदाज (left-arm spinner), २२ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणारे आणि १९६०चं दशक गाजवलेले भारताचे माजी क्रिकेटपटू (Cricketer) बिशन सिंग बेदी (Bishan Singh Bedi) यांचं वयाच्या ७७व्या वर्षी निधन झालं आहे. दीर्घकालीन आजारामुळे (Prolonged illness) आज त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या उत्तम गोलंदाजी कौशल्याने त्यांनी अनेक सामन्यांतून फलंदाजांना चीतपट केले होते. बेदी यांनी भारताला पहिली वन डे मॅच जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.


बिशनसिंग बेदी या दिग्गज फिरकीपटूने १९६७ ते १९७९ दरम्यान भारतासाठी ६७ कसोटी खेळल्या आणि २६६ विकेट्स घेतल्या होत्या. तर, त्यांनी १० एकदिवसीय सामन्यांमध्ये सात विकेट्स घेतल्या होत्या. इरापल्ली प्रसन्ना, बीएस चंद्रशेखर आणि एस. वेंकटराघवन यांच्यासमवेत बिशन सिंग बेदी हे भारताच्या फिरकी गोलंदाजीच्या इतिहासात एका प्रकारच्या क्रांतीचे शिल्पकार होते.


भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये बेदी प्रथम उत्तर पंजाबसाठी खेळले, तेव्हा ते फक्त पंधरा वर्षांचे होते. १९६८-६९ मध्ये ते दिल्लीला गेले आणि १९७४-७५च्या रणजी करंडक स्पर्धा त्यांनी गाजवली व ६४ विकेट्स घेतल्या. बेदी यांनी अनेक वर्षे इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये नॉर्थम्प्टनशायरचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५६० विकेट्ससह आपली कारकीर्द पूर्ण केली. त्यांच्या निधनाने क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला