Dhangar Samaj : मराठ्यांनंतर आता आरक्षणासाठी धनगर युवकाची आत्महत्या... खिशात आढळली एक चिठ्ठी

पश्चिम महाराष्ट्रात घडली घटना...


जत : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणारे पुढारी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला दिलेल्या अल्टीमेटमला आता केवळ एक दिवस उरला आहे. यानंतर मराठा समाज आणखी पेटून उठण्याची शक्यता आहे. यात खेदाची बाब म्हणजे मराठा युवक आरक्षणासाठी आत्महत्या (Suicide) करत आहेत. मुंबई, बीड, नांदेड या ठिकाणी मराठा आरक्षण मिळावे म्हणून तरुणांनी आपलं जीवन संपवल्याच्या धक्कादायक घटना घडल्या. यानंतर आता धनगर समाजही (Dhangar Samaj) आक्रमक झाला असून पश्चिम महाराष्ट्रातील जत तालुक्यातील एका युवकाने धनगरांना आरक्षण मिळावे म्हणून शेतात गळफास लावून आत्महत्या केली आहे.


बिरुदेव वसंत खर्जे असं ३८ वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. तो जत तालुक्यात कुणीकोनूरमध्ये आबाचीवाडी येथे राहणारा होता. काल संध्याकाळी त्याचा मृतदेह शेतात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. बिरूदेवने धनगर आरक्षण मिळावे, माझ्या मृत्यूनंतर कोणालाही दोषी धरू नये व माझ्या कुटुंबाला कशाचा त्रास होऊ नये, अशा आशयाची चिठ्ठी खिशात ठेवून आपल्याच शेतात झाडाला गळफास घेतला. बिरुदेवची मुलगी शेताकडे पाण्याची मोटार बंद करण्यास निघाली होती. तिने बिरुदेवचा मृतदेह झाडावर पाहिला. मुलीने ही घटना घरच्यांना सांगितली.


नागरीक व पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी पंचनामा केला. रात्री उशिरा जत ग्रामीण रुग्णालय येथे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. जत तालुक्यातील धनगर समाजबांधव रुग्णालयाजवळ जमले होते. रात्री उशिरापर्यंत उमदी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली नव्हती. मात्र पोलीस उपअधीक्षक सुनील शेळके यांनी प्राथमिक तपासात आरक्षणाच्या मागणीसाठी घटना घडल्याचे समोर आल्याचे सांगितले, त्यानंतर नोंद करण्यात आली. बिरुदेव यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री