India-Canada Tensions: कॅनडाने ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना बोलावले माघारी, भारताने दिला होता देश सोडण्याचा आदेश

नवी दिल्ली: कॅनडाने(canada) भारतातील आपल्या ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलावले आहे. खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्यााचा आरोप भारतावर केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी गुरूवारी अधिकाऱ्यांना माघारी बोलावण्याबाबतची माहिती दिली. त्यांनी हे ही म्हटले की कॅनडा प्रत्युत्तर कारवाई करणार नाही.


खरंतर, कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या प्रत्युत्तर कारवाईचा अर्थ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनाही देश सोडण्याच्या आदेशाबद्दल आहे. परराष्ट्र मंत्री जोली यांनी सांगितले भारताने राजनैतिक अधिकाऱ्यांना शुक्रवारपर्यंत देश सोडण्याचा आदेश दिला होता. जर त्यांनी असे केले नाही तर त्यांचे राजनैतिक पद्द रद्द केले जाईल.



भारताच्या अधिकाऱ्यांना देश सोडण्यास नाही सांगणार कॅनडा


परराष्ट्र मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, भारताच्या कारवाईमुळे आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेता आम्ही त्यांना भारतातून बोलावले आहे. जर आम्ही राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी बनवलेले नियम तोडतो तर जगात कोणतेच राजनैतिक अधिकारी सुरक्षित राहणार आहे. यामुळे आम्ही भारताच्या या कारवाईवर कोणत्याही प्रकारचा प्रतिक्रिया देणार नाही. ज्या ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांनी भारत सोडला आहे. त्यांच्यासोबत ४२ असे लोक आहे जे त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत.



भारत-कॅनडा यांच्यातील वादाचे कारण


खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची या वर्षी जूनमध्ये सर्रे शहरातील एका गुरूद्वारात हत्या करण्यात आली. या हत्येनंतर कॅनडात राहणाऱ्या खालिस्तानी समर्तकांनी कॅनडा सरकारव दबाव आणण्यास सुरूवात केली. त्यांचे म्हणणे होते की या हत्येमागे भारताचा हात आहे. यानंतर सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी संसदेत येत निज्जर यांच्या हत्येचा आरोप भारतावर केला. तसेच ओटावामधील भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले.


भारताने ट्रुडो यांचे हे दावे फेटाळून लावले होते. त्यानंतर भारतानेही प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली. कॅनडाच्या अनेक राजनैतिक अधिकाऱ्यांना त्यांनी देश सोडण्याचे आदेश दिले. यानंतरच भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव वाढण्यास सुरूवात झाली. यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बातमी आली की भारताने नवी दिल्लीतील कॅनडाच्या ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले. भारतात कॅनडाचे एकूण मिळून ६२ राजनैतिक अधिकारी आहेत.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.