Pollution: सलग तिसऱ्या दिवशी मुंबईची हवा दिल्लीपेक्षाही खराब, धुक्यामुळे लोकलचा वेगही मंदावला

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई(mumbai) प्रदूषणाच्या(pollution) बाबतीत राजधानी दिल्लीला(delhi) मागे टाकत आहे. मुंबईने सलग तिसऱ्यांदा प्रदूषित शहर बनण्याच्या यादीत दिल्लीला मागे टाकले. मंगळवारपर्यंत मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक(Air Quality Index) ११३ इतका होता. गुरूवारी सकाळी हा आकडा वाढून १६१ इतका झाला आहे. दिल्लीपेक्षाही हा आकडा भयानक आहे. गुरूवारी सकाळपर्यंत दिल्लीचा AQI ११७ इतका होता.


वाहन प्रदूषणामुळे दिल्ली नेहमीच सगळ्यात जास्त प्रदूषित शहर राहिले आहे. येथे सर्वाधिक प्रदूषण साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात होते आणि दिवाळीत याचा स्तर धोकादायक पातळीपर्यंत वाढतो. दिल्ली सरकार गेल्या काही वर्षांपासून या समस्येसाठी हरयाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना दोषी ठरवत आहे.


दरम्यान, मुंबईत धुक्याची चादरही दाट झालेली दिसत आहेय यामुळे AQI मध्ये मुंबईने दिल्लीला मागे टाकले. महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले की मुंबईत सुरू असलेल्या निर्माण योजना, जसे मेट्रोची कामे हे प्रदूषण अधिक वाढवण्यास मदत करत आहेत. ते पुढे म्हणाले, प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात फॉगिंग मशीन लावली जात आहेत.


याशिवाय धुक्यामुळे लोकलचा वेगही मंदावला आहे. पीटीआयच्या बातमीनुसार मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले की, मुंबईच्या ठाणे जिल्ह्यातील वाशिंद आणि टिटवाळादरम्यान सकाळी साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत तसेच रायगड जिल्ह्याच्या कर्जत ते बदलापूर दरम्यान सकाळी साडेपाच ते ९ वाजेपर्यंत धुक्याची चादर पसरली होती.

Comments
Add Comment

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ahilyanagar : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीला अटक; दोन गावे कडकडीत बंद

Ahilyanagar ( राहुरी /आश्वी प्रतिनिधी ) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यात तुळापूर (Tulapur) येथील एक संतापजनक घटना