Devendra Fadnavis : 'कंत्राटी भरतीचा पहिला जीआर काँग्रेसचा, संपूर्ण पाप उबाठा सेना, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं'

  218

जीआर रद्द करत असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा


मुंबई : राज्यातील कंत्राटी भरतीवरुन सध्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. यासाठी महाविकास आघाडीने आंदोलनही सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर पुराव्यांसह हल्लाबोल केला. तसेच काँग्रेस सरकारच्या काळात जे कंत्राटी भरतीसाठी जीआर काढले ते रद्द करत असल्याची घोषणा फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.


कंत्राटी भरती संदर्भात आमच्या सरकारवर आरोप केले जात आहेत. मात्र, हे पाप काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातील असून याचे खापर आमच्यावर फोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आम्ही यांच्या चेहऱ्यावरील बुरखा आता फाडला असून आमच्या सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली.


काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असतानाच कंत्राटी पद्धतीने भरतीचा पहिला निर्णय घेण्यात आला असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना २०१० मध्ये पहिल्यांदाच या संदर्भातला जीआर काढण्यात आला, असल्याची माहिती देखील फडणवीस यांनी दिली. सर्वात आधी शिक्षक भरतीचा कंत्राटी जीआर अशोक चव्हाण यांनी पहिला जीआर काढला असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.


अशोक चव्हाण यांच्या नंतरच्या काळाज पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासंदर्भातला जीआर काढण्यात आला असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कंत्राटी पद्धतीने भरती संदर्भात विरोधकांच्या सर्व प्रश्नांना देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले.



उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असतानाच कंत्राटी भरतीला मान्यता


शरद पवार यांच्या आर्शीवादाने २०२१ मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखिल कंत्राटी भरतीचा निर्णय झाला असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. कंत्राटी भरतीचे हे सर्व पाप, काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पाप त्यांनी करायचे आणि त्यांचे खापर आमच्या माथ्यावर फोडायचे हे, आम्हाला मान्य नसल्याचे फडणवीस म्हणाले.



महाराष्ट्राची माफी मागा


या प्रकरणाचे सर्व पाप काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे आहे. त्यामुळे राज्यातील युवकांची दिशाभुल केल्याबद्दल या पक्षांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जर ते माफी मागणार नसतील तर आम्हाला त्यांना जनतेसमोर उघडे पाडावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Comments
Add Comment

वादग्रस्त विधाने करू नयेत, सर्वांनी समन्वयाने काम करावे - आमदार दीपक केसरकर

सिंधुदुर्ग - महायुतीची सध्याची राजकीय परिस्थिती चांगली असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची वादग्रस्त

समृद्धीवर वेगमर्यादेचे उल्लंघन, आता असणार सीसीटीव्हीची नजर

अमरावती : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, महिलेचा मृत्यू

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर एका मोपेडला ईर्टीका कारने जोरदार धडक

Sambhajinagar Illegal Construction: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध बांधकामावर हातोडा; विरोध करणाऱ्यावर होणार कायदेशीर कारवाई

विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दोन दिवसांच्या

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत