Aamir Khan: स्वप्ननगरी मुंबई सोडणार आहे आमिर खान! का घेतोय इतका मोठा निर्णय

मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानबाबत(aamir khan) मोठी बातमी समोर आली आहे. हा अभिनेता लवकरच मायानगरी मुंबईला अलविदा म्हणणार आहे. असे सांगितले जात आहे की पुढील दोन महिन्यांत आमिर खान चेन्नईला शिफ्ट होईल. चेन्नईला शिफ्ट होण्यामागचे सगळ्यात मोठे कारण त्यांची आई जीनत हुसैन आहे.



स्वप्ननगरी मुंबई सोडणार आमिर खान


इंडिया टुडेशी बोलताना अभिनेत्याच्या जवळील सूत्रांनी सांगितले की आमिर खानसाठी त्यांचे कुटुंब सर्वात आधी आहे. त्याची आई चेन्नईमध्ये राहते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशातच आमिरला आपला पूर्ण वेळ आईसोबत घालवायचा आहे. याच कारणामुळे तो चेन्नईला शिफ्ट होण्याचा विचार करत आहे.



आईमुळे घेतला हा निर्णय


सूत्रांनी पुढे सांगितले की ज्या रुग्णालयात आमिर खानच्या आईवर उपचार सुरू आहत त्याच्या जवळच्या हॉटेलमध्ये हा सुपरस्टार राहणार आहे. आमिर खान कामासोबत आपल्या कुटुंबालाही वेळ देतात. तो आपल्या मुलीच्याही अतिशय जवळ आहे.



आमिर खानचा आगामी सिनेमा


आमिरच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास नुकताच त्याच्या सितेरा जमीन पर या सिनेमाची घोषणा झाली आहे. या सिनेमामध्ये ९ मुलांची कहाणी दाखवली जाईल ज्यांना अनेक प्रकारचे त्रास असतात. हा सिनेमा पुढील वर्षी २०२४मध्ये रिलीज होणार आहे.

Comments
Add Comment

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागचा राजा मंडळाची पहिली मोठी अ‍ॅक्शन; कोळी बांधवाला थेट कोर्टात खेचणार, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : दरवर्षीप्रमाणे या वर्षीही लालबागचा राजा गणेशोत्सव संपल्यानंतर गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आला.

लालबागचा राजा नव्हे... देणगीच्या बाबतीत 'हा' गणपती मुंबईत आघाडीवर, ५ दिवसांत मिळाली १५ कोटींची देणगी

मुंबई: दरवर्षी, मुंबईतील किंग सर्कलमधील गौड सारस्वत ब्राह्मणांच्या (जीएसबी) गणपती मंडळात पाच दिवस गणेशोत्सव

मराठा आरक्षणासंदर्भातील जीआरमुळे ओबीसी समाजाचे अस्तित्व धोक्यात! ओबीसी नेत्यांचे ठरले

न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाईसाठी ओबीसी संघटनांची तयारी मुंबई: राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण

गोराई बीचवर भरतीच्या लाटेत बस गेली वाहून, प्रवाशांचं काय झालं पहा...

मुंबई: गोराई बीचवर सोमवारी एक थरारक घटना घडली. एक मिनीबस भरतीमुळे समुद्राच्या लाटेत वाहून गेल्याने घबराट

गुजरातहून आणलेल्या तराफामुळे लालबागच्या राजाचे विसर्जन लांबले, कोळी बांधव संतापले

मुख्यमंत्र्यांकडे केली कठोर कारवाईची मागणी मुंबई: लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला यंदा विलंब

MahaRERA : बाधित घर खरेदीदारांना दिलासा; ५,२६७ तक्रारी निकाली, भविष्यातील फसवणूक रोखण्यासाठी महारेराचे कठोर पाऊल

मुंबई: राज्यातील घर खरेदीदारांच्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी महारेरा (MahaRERA) प्रशासनाने मोठी मोहीम हाती