Aamir Khan: स्वप्ननगरी मुंबई सोडणार आहे आमिर खान! का घेतोय इतका मोठा निर्णय

  230

मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानबाबत(aamir khan) मोठी बातमी समोर आली आहे. हा अभिनेता लवकरच मायानगरी मुंबईला अलविदा म्हणणार आहे. असे सांगितले जात आहे की पुढील दोन महिन्यांत आमिर खान चेन्नईला शिफ्ट होईल. चेन्नईला शिफ्ट होण्यामागचे सगळ्यात मोठे कारण त्यांची आई जीनत हुसैन आहे.



स्वप्ननगरी मुंबई सोडणार आमिर खान


इंडिया टुडेशी बोलताना अभिनेत्याच्या जवळील सूत्रांनी सांगितले की आमिर खानसाठी त्यांचे कुटुंब सर्वात आधी आहे. त्याची आई चेन्नईमध्ये राहते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशातच आमिरला आपला पूर्ण वेळ आईसोबत घालवायचा आहे. याच कारणामुळे तो चेन्नईला शिफ्ट होण्याचा विचार करत आहे.



आईमुळे घेतला हा निर्णय


सूत्रांनी पुढे सांगितले की ज्या रुग्णालयात आमिर खानच्या आईवर उपचार सुरू आहत त्याच्या जवळच्या हॉटेलमध्ये हा सुपरस्टार राहणार आहे. आमिर खान कामासोबत आपल्या कुटुंबालाही वेळ देतात. तो आपल्या मुलीच्याही अतिशय जवळ आहे.



आमिर खानचा आगामी सिनेमा


आमिरच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास नुकताच त्याच्या सितेरा जमीन पर या सिनेमाची घोषणा झाली आहे. या सिनेमामध्ये ९ मुलांची कहाणी दाखवली जाईल ज्यांना अनेक प्रकारचे त्रास असतात. हा सिनेमा पुढील वर्षी २०२४मध्ये रिलीज होणार आहे.

Comments
Add Comment

प्रसिद्ध मराठी कलाकार किशोर कदम यांचे मुंबईतलं घर धोक्यात! मुख्यमंत्र्यांना केले मदतीचे आवाहन, नेमकं प्रकरण काय?

कमिटी, पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने घोटाळा घडवल्याचा केला आरोप  मुंबई: कवी सौमित्र म्हणून प्रसिद्ध असलेले

ओप्पोने के13 टर्बो सीरिजमध्ये दोन नवे गेमिंग स्मार्टफोन केले लॉन्च

मुंबई : ओप्पोने आपल्या गेमिंग केंद्रित के13 टर्बो मालिकेत दोन नवे स्मार्टफोन के13 टर्बो प्रो

अंगारकी संकष्टी चतुर्थीसाठी मेट्रोची सेवा वाढवली!

मुंबई : १२ ऑगस्ट रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी

खेकडे पकडायला गेले आणि बुडून मेले

कांदिवलीतील तलावात खेकडे पकडताना पिता-पुत्राचा बुडून मृत्यू मुंबई : कांदिवली पूर्व येथे एका तलावात खेकडे

राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी विभागातील सर्वांनी प्रयत्न करावेत : मंत्री नितेश राणे

मुंबई : राज्यात मत्स्योत्पादन वाढीसाठी मोठ्या संधी आहेत. यंदाच्या हंगामामध्ये राज्यात ४७ टक्के मत्स्योत्पादन

ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ : मुंबईत क्रिकेट स्टार्सचा मेळावा, ट्रॉफी टूरला जल्लोषात सुरुवात

मुंबई : मुंबईत आज ‘ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५’ च्या ‘५० दिवस बाकी’ कार्यक्रमाला क्रिकेट जगतातील दिग्गजांची