Nitesh Rane : आदित्य ठाकरेंचं कॅव्हेट म्हणजे चोर की दाढी में तिनका

केवळ मतांच्या राजकारणासाठी इंडिया अलायन्सचं दहशतवाद्यांना समर्थन


भाजप आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल


मुंबई : देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी (Narendra Modi) काल इस्राइली दहशतवाद्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेचं समर्थन केलं आणि त्यावर आदरणीय शरद पवार (Sharad pawar) साहेबांनी टीका केली. आश्चर्य असं वाटतं की ज्या पवार साहेबांना १९९२ दंगलीच्या काळात जेव्हा बॉम्बब्लास्ट झाले आणि त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आलं होतं तेव्हा दहशतवादी देशाची कशी वाट लावू शकतात हे त्यांनी स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं. तरीही केवळ मतांच्या राजकारणासाठी ते आमच्या पंतप्रधानांवर टीका करत होते, असा हल्लाबोल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला.


पुढे नितेश राणे म्हणाले, इंडिया अलायन्सच्या (INDIA Alliance) कोणालाही आम्ही कुठेही हमासचा निषेध करताना ऐकलेलं नाही. दहशतवाद्यांविरोधात बोलताना आम्ही ऐकलं नाही. म्हणजे मतांच्या राजकारणासाठी किती लाचार व्हायचं याला काही मर्यादा राहिलेली नाही. देशामध्ये जे जिहादी विचारांचे लोक आहेत, ते हमासचं समर्थन करतात आणि इंडिया अलायन्सचे लोक त्यांना पाठिंबा देतात. मी तर असं ऐकलं की तो ओवेसी कार्टा त्यांच्या समर्थनार्थ रॅली काढणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे देखील ओवेसींच्या खांद्याला खांदा लावून त्या रॅलीत उद्या दिसले तर आश्चर्य वाटायला नको.


आज सकाळी संजय राजाराम राऊत भांडुपमध्ये बसून आमच्या पंतप्रधानांना, परराष्ट्र मंत्र्यांना, देवेंद्र फडणवीसांना, मुख्यमंत्र्यांना सल्ले देत होता. वाजपेयी साहेबांचे दाखले देत होता. पण जो बाळासाहेबांचे विचार विसरला आहे, त्यांची हमासविरोधी, दहशतवादाविरोधी भूमिका विसरला आहे, त्याने आम्हाला सल्ले देऊ नयेत, असं नितेश राणे यांनी राऊतांना बजावलं आहे.



हा नियतीचा खेळ आहे


ठाण्यामध्ये टेंभीनाक्यावर जो नवरात्रौत्सव साजरा होतो त्या ठिकाणी आज रश्मी ठाकरे दर्शनाला गेल्या होत्या. तर तिकडचा फॅन आणि कुलर कोणीतरी बंद केला म्हणून त्यांचा फार जळफळाट झाला, त्यांना चीड आली. तिथले अधिकारी त्यांना घाबरले. उद्धव ठाकरेंना मी आठवण करुन देईन की, २००४ मध्ये रंगशारदाला होणार्‍या शिवसेनेच्या मेळाव्याला बाळासाहेब ठाकरे येणार होते, पण त्या ठिकाणी नारायण राणे साहेबांना बसायला देऊ नये म्हणून खुर्ची काढून टाकण्याचे आदेश तुमच्याकडून देण्यात आले होते. असाच प्रकार तुम्ही राज ठाकरे साहेबांसोबत देखील केला. त्यांची खुर्चीच स्टेजवरुन काढून टाकण्यात आली होती. आज तुमच्या बायकोवरही तशीच वेळ आली. त्यामुळे हा नियतीचा खेळ आहे. नियती बरोबर आपल्या पद्धतीने प्रत्येकाला उत्तर देते, असं नितेश राणे म्हणाले.



चोर की दाढी में तिनका


दिशा सालियन आणि सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांनी कॅव्हेट दाखल करत आमचीही बाजू ऐकून घ्यावी, असं म्हटलं आहे. यावर नितेश राणे म्हणाले, याला चोर की दाढी में तिनका असं म्हणतात. जर ती आत्महत्या होती तर त्या संदर्भात आदित्य ठाकरेंना इतकी चिंता का वाटते? ते तर तिथे उपस्थित नव्हते. मग तुम्हाला कन्व्हेंट दाखल करावंसं का वाटलं? त्यामुळे आमच्यासारख्या फॅन्सचं म्हणणं आहे की त्यांचा मर्डर झाला होता आणि त्यातील नावं आता हळूहळू आपोआप बाहेर येतील आणि दोघांनाही न्याय मिळेल.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Chandrashekar Bawankule : मुंबई आणि पुण्यातील २०११ पूर्वीच्या अतिक्रमणधारकांना मिळणार हक्काचे घर

वगळलेल्या भागातील बांधकामांचे सर्वेक्षण होणार; कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन मुंबई :

Junk Food Ban : शाळांच्या परिसरात हाय फॅट, हाय सॉल्ट आणि साखरयुक्त पदार्थांचा समावेश असलेल्या जंक फूडच्या विक्रीवर बंदी; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

मुंबई : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी आणि त्यांना लहान वयातच लठ्ठपणा तसेच विविध

Sunetra Pawar : मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आणि अजित पवारांच्या जयंतीदिनी ९५ हजार नागरिकांनी आरोग्यसेवांचा लाभ घेतला

'महा आरोग्य शिबिराला' राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद; ८ हजार ९४० नागरिकांनी रक्तदान केले मुंबई : मुख्यमंत्री

Urban Development Department : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकासकामांवर आता एआय आणि 'जीओ टॅगिंगची' नजर - नगरविकास विभागाचा निर्णय

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ अधिवेशनात केलेल्या घोषणेची

Pratap Sarnaik : NCMC स्मार्ट कार्डसाठी आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय मुंबई : एसटी प्रवासात

Mumbai News : कित्येक वर्ष टीबी आणि दमा समजून उपचार पण ...; १० वर्षांच्या मुलीला मिळाले नवे जीवन

मुंबई : एखाद्या आजाराचे योग्य वेळी आणि अचूक निदान किती महत्त्वाचे असते, याचे उदाहरण मुंबईतील धारावी येथे समोर आले