Mumbai Weather : मुंबईकरांनो आता मास्क लावूनच फिरा! कोरोना नव्हे तर 'हे' कारण...

मुंबईकरांना काळजी घ्यायची गरज 


मुंबई : कोरोनाच्या काळात (Covid pandemic) तोंडावर मास्क (Mask) लावून फिरताना अक्षरशः नाकी नऊ आले होते. याची सवय नसल्यामुळे ब-याचदा लोकांना श्वास गुदमरल्यासारखं व्हायचं. नंतर सवय झाली आणि कोरोनाचा प्रभावही काही प्रमाणात कमी झाला. लोकांनी मास्क लावणं सोडून दिलं. पण आता पुन्हा एकदा मास्क लावण्याची वेळ आली आहे. मात्र, यावेळेस कोरोना नव्हे तर मुंबईचं प्रदूषित (Pollution) झालेलं (Mumbai bad Weather) वातावरण मास्क लावण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.


दिल्लीतील (Delhi) हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (Air Quality Index) हा दरवर्षी सगळ्यात जास्त खालावलेला असतो. तिथली प्रचंड लोकसंख्या आणि औद्योगिकीकरणाचे अनेक प्रकल्प यामुळे दिल्लीची हवा प्रदूषित झाली आहे. या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक प्रयत्नही केले जात आहेत. मात्र, असं असतानाच मुंबई आणि पुण्याने गुणवत्तेच्या बाबतीत दिल्लीलाही मागे टाकलं आहे. दिल्लीच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक ११० आहे तर मुंबईच्या बाबतीत तो १४६ इतका वाढला आहे. पुण्याने तर १७८ इतक्या प्रदूषित हवेचा निर्देशांक गाठला आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यातील लोकांना श्वसनाचे विकार जडू नयेत यासाठी मास्क लावणे गरजेचे आहे.


मुंबईची हवा सध्या दिल्लीपेक्षाही खराब आहे आणि हवेतील धुलिकणांमुळे सकाळच्या वेळेस दृश्यमानताही प्रचंड कमी होते. सकाळच्या वेळेस धुकं पसरलंय की काय अस वाटत असलं तरी ती प्रदूषणामुळे खराब झालेली हवा आहे. या हवेत जास्त काळ राहिल्यास श्वसनाचे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे मास्क लावणे सक्तीचे नसले तरी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा याचा गंभीर त्रास होऊ शकतो.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Poison Capsule Case: विषारी कॅप्सूल वाटप प्रकरणात सायको किलरचा मास्टरप्लॅन; AI ला विचारले नको ते प्रश्न 

मुंबई: मुंबईतील (Mumbai) मोहरम मिरवणुकीदरम्यान विषारी कॅप्सूल वाटप (Poison Capsule Case) करण्याच्या संशयित कटाचा मुंबई

लोकल प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा निर्णय; स्थानकांवर बॅगांची होणार तपासणी

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल रेल्वेत प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांनी

'निवडक प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा होणार राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन'

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी पालघर : राज्याच्या पायाभूत

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर