MSP increased : सणासुदीच्या काळात मोदी सरकारची शेतकर्‍यांसाठी खुशखबर!

यंदाची दिवाळी असणार खास...


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिवाळीच्या (Diwali) पार्श्वभूमीवर अनेक निर्णय घेतले आहेत. सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक तसेच केंद्रीय निमलष्करी दल आणि सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. यासोबतच शेतकर्‍यांसाठी (Farmers) देखील दिवाळीकरता केंद्र सरकार (Central Government) एक खुशखबर घेऊन आलं आहे.


दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने एमएसपी (MSP) म्हणजेच किमान आधारभूत किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ६ रब्बी पिकांचा एमएसपी वाढवण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने एमएसपी २% वरून ७% पर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली. या निर्णयाला सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली.



या ६ रब्बी पिकांसाठी एमएसपी वाढवला आहे :-


१. मसूरच्या एमएसपीमध्ये ४२५ रुपये प्रति क्विंटल वाढ


२. गव्हाच्या एमएसपीमध्ये १५०रुपये प्रति क्विंटल वाढ


३. हरभऱ्यासाठी एमएसपी १०५ रुपये प्रति क्विंटलने वाढला आहे


४. करडई पिकाच्या एमएसपीमध्ये १५० रुपये प्रति क्विंटल वाढ


५. बार्लीच्या एमएसपीमध्ये ११५ रुपये प्रति क्विंटलने वाढ


६. तेलबिया आणि मोहरीच्या एमएसपीमध्ये २०० रुपये प्रति क्विंटल वाढ



एमएसपीमुळे काय फायदा होतो?


केंद्र सरकार पिकांची किमान किंमत ठरवते, त्याला एमएसपी म्हणतात. त्यामुळे पिकांचे बाजारभाव जरी घसरले तरी केंद्र सरकार या एमएसपीवर शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी करते. एमएसपीचा उद्देश शेतकऱ्यांना नुकसानीपासून वाचवणे हा आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या

Monsoon in Andaman 2026 : आला रे आला...अंदमान-निकोबारमध्ये पावसाची हजेरी, केरळ आणि कोकणात कधी धडकणार ?

संपूर्ण देशातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी राजा ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सून अखेर अंदमानच्या  (Andaman)

Fake News Alert! : अफवांवर विश्वास ठेवू नका! राज्यात 'कॅब' सेवा सुरूच राहणार; 'डीजीआयपीआर'ने सांगितले सत्य!

सध्या सोशल मीडियावर ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) यांसारख्या लोकप्रिय कॅब सेवा महाराष्ट्रात कायमच्या बंद झाल्या