Diwali Bonus : मोदी सरकार करणार सरकारी कर्मचार्‍यांची दिवाळी आणखी गोड!

कोणते नवे निर्णय?


नवी दिल्ली : सणासुदीचा काळ (Festive Season) आला की मध्यमवर्गीयांच्या खिशाला कात्री लागत जाते. पण तरीही सण साजरे करण्यात कसलीही कसर पडू न देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. हीच बाब लक्षात घेऊन राज्य व केंद्र सरकार (State and Central Government) सणासुदीच्या काळात लोकांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेत असतात. दिवाळीत (Diwali) तसेच गणेशोत्सवात (Ganeshotsav) गोडाधोडाचा फराळ करण्यासाठी महायुती सरकारकडून आनंदाचा शिधा वाटला जातो. तर दुसरीकडे केंद्र सरकारही आपल्या कर्मचार्‍यांना सणासुदीच्या काळात आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्नशील असते. यंदाही मोदी सरकारने सरकारी कर्मचार्‍यांची (Government Employees) दिवाळी आणखी गोड करणारे काही निर्णय घेतले आहेत.


दिवाळीच्या मुहूर्तावर अर्थ मंत्रालयाने २०२२-२३ या वर्षासाठी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना बिगर-उत्पादकता लिंक्ड बोनस (Bonus) देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या गट ब आणि गट क अंतर्गत येणारे अराजपत्रित कर्मचारी, जे कोणत्याही उत्पादकता लिंक्ड बोनस योजनेंतर्गत समाविष्ट नाहीत, त्यांना हा बोनस दिला जाईल. या कर्मचाऱ्यांना ३० दिवसांच्या पगाराच्या बरोबरीने पैसे मिळतील. केंद्र सरकारच्या या निर्णयामध्ये पॅरा मिलिटरी फोर्सच्या जवानांचाही समावेश केला जाणार आहे. त्यांना ७,००० रुपयांपर्यंतचा दिवाळी बोनस दिला जाणार आहे. याशिवाय केंद्रीय निमलष्करी दल आणि सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांनाही बोनसचा लाभ दिला जातो.


मोदी सरकारने दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना (Pention holders) मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महागाई भत्ता ४ टक्के वाढवून ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी सरकारी कर्मचार्‍यांसाठी कास असणार आहे.





Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने