Rashtravadi Congress : मोठा निर्णय! राष्ट्रवादीचे दोन्ही गट 'या' पाच राज्यांच्या निवडणुका लढवणार नाहीत...

नेमकं झालं काय?


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडल्यापासून दोन्ही गटांकडून राज्याच्या राजकारणात उलथापालथ करणारे निर्णय घेतले जातात. दोन्ही गटांची नेमकी भूमिका काय हेच बर्‍याचदा स्पष्ट होत नाही. अशातच आता अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) गटाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. दोन्ही गट आगामी पाच राज्यांच्या निवडणुका लढवणार नाहीत. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत (Symbol) निवडणूक आयोगात लढाई सुरु असल्याने चिन्ह गोठवण्यात येऊ नये याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे.


देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आणि पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. यामध्ये मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, राजस्थान आणि मिझोरम या पाच राज्यांचा समावेश आहे. मात्र, या पाचही राज्यांमध्ये राष्ट्रवादीचा तितकासा प्रभाव नाही. शिवाय राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात सुरु आहे. दोन्ही गटांपैकी एकाने जरी निवडणूक लढवायचे ठरवले तर कायदेशीर पेच निर्माण झाला असता आणि त्यानंतर चिन्ह गोठवण्याची शक्यताही निर्माण झाली असती. त्यामुळे दोन्ही गटांनीही या निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी पक्षावर अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाकडून दावा सांगितला जात आहे. हे दोन्ही गट आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीच्या तयारीला देखील लागले होते. मात्र, येत्या ९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीच्या चिन्हाची पुढची सुनावणी होणार आहे. त्यामुळे एक प्रकारे चिन्हाबाबतचा पेच निर्माण झाला असता. त्यामुळे ही लढाई सुरु असताना दोन्ही गटांकडून संभाव्य धोका टाळण्याचा प्रयत्न केला गेला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई

Raj Thackeray : भावाशी युती करूनही राज ठाकरेंच्या खात्यात २२ शून्य, मुंबईत 'मनसे'ला जबरदस्त धक्का; ठाकरे ब्रँड फेल!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल

तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांचा प्रचंड मतांनी दणदणीत विजय

वार्ड ४७ मध्ये तरुणाईचा विजयघोष मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक ४७ मधून भारतीय जनता पक्षाचे

Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रानं विकासालाच कौल दिला!" भाजपच्या मुसंडीनंतर बावनकुळेंनी मानले मतदारांचे आभार

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांचे कल स्पष्ट होऊ लागले असून, भाजपने महायुतीसह मुसंडी मारली