Rahul Narvekar : संजय राऊत प्रसिद्धीसाठी हपापलेला माणूस, त्याच्याकडे लक्ष का द्यावे?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची टीका


मुंबई : गेले अनेक महिने प्रलंबित असलेला आमदारांच्या अपात्रतेचा (MLA disqualification) प्रश्न निकाली लागलेला नाही. शिवसेना व उबाठा (Shivsena Vs Ubatha) हे दोन्ही गट या निकालाची वाट पाहत आहेत. तर, संपूर्ण माहितीशिवाय निकाल देऊ शकत नाही, अशी भूमिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी घेतली आहे. मात्र, यावर उबाठाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका करायला सुरुवात केली आहे. 'ज्या प्रकारे संजय राऊत विधानसभा अध्यक्षांवर टीका करत आहेत, त्याचा अर्थ ते त्यांना निकाल आमच्याच बाजूने लावा असा दबाव टाकत आहेत, याची माननीय कोर्टाने दखल घ्यावी', असे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीदेखील संजय राऊतांना सुनावले होते. यानंतर आता विधानसभा अध्यक्षांनीही संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे.


राहुल नार्वेकर म्हणाले, बिनबुडाचे आरोप ते केवळ आणि केवळ निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकावा आणि आपल्याला हवे तसे घडवून घ्यावे, याच हेतूने केले जातात. संजय राऊत यांना स्वस्त प्रसिद्धी प्राप्त करण्याची जुनी सवय आहे, असे मला वाटते. त्यामुळे अशा प्रवृत्तीला उत्तर देऊन प्रोत्साहन न देणे हा सर्वात उत्तम उपाय आहे. अशा व्यक्तींबद्दल आपण का बोलावे? आणि त्यांना का महत्त्व द्यावे? संजय राऊत म्हणजे, काय सुप्रीम कोर्ट आहेत का? संजय राऊत म्हणजे, काय प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत का? नाही. त्यामुळे आपण त्यांनी दिलेल्या वक्तव्याकडे लक्ष का द्यावे? संजय राऊत यांना जर विधिमंडळाचे नियम समजले असते, तर त्यांनी असे वक्तव्य केले नसते. अध्यक्षांचे अधिकार आणि जबाबदाऱ्यांची त्यांना माहिती असती, तर असे वक्तव्य केले नसते. आपल्याला सांगितल्याप्रमाणे संजय राऊतांसारख्या व्यक्तींच्या प्रश्नाला किंवा आरोपांना उत्तर देऊन मी स्वतःची गरिमा कमी करू इच्छित नाही, असे प्रत्युत्तर राहुल नार्वेकर यांनी दिले.


दरम्यान, सर्वप्रथम आपल्याला हे जाणून घ्यावे लागेल की, नेमके नियमबाह्य अथवा घटनाबाह्य काय कृत्य झाले आहे, ते जर समजले नाही, तर पुढची कारवाई कशी काय होऊ शकेल? त्यामुळे सुनावणीनंतर जास्त स्पष्टता प्राप्त होईल, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. तसेच जे वेळापत्रक बनवले होते, त्यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई करायची नव्हती. परंतु, केवळ हेतूपरत्वे एकूण दबाव तंत्राचा वापर करण्यासाठी जर का असे आरोप केले जात असतील, तर या आरोपांची दखल घेत नाही आणि घ्यायची गरजही नाही, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या