Drug Trafficking Case : अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी ईडीची मुंबईत छापेमारी

२०० कोटींच्या ड्रग्जची युरोप, ऑस्ट्रेलियात तस्करी केल्याचा आरोप


मुंबई : अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी (Drug Trafficking Case) ईडीकडून (ED) मुंबईत छापेमारी करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विकणारा अली असगर शिराझी (Ali Asgar Shirazi) याच्या विरोधात ईडीकडून छापे टाकण्यात आले. अली असगर हा वाँटेड ड्रग्स लॉर्ड कैलाश राजपूतचा जवळचा सहकारी असल्याचे समजते. तसेच, शिराझी याच्यावर २०० कोटी रुपयांच्या ड्रग्जची युरोप आणि ऑस्ट्रेलियात तस्करी केल्याचा आरोप आहे.


ड्रग तस्कर अली असगर शिराझी अंधेरी परिसरात वास्तव्याला असून त्याचे घर आणि ऑफिस याठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. मुंबई गुन्हे शाखेने याच वर्षी मे महिन्यात शिराझीला अटक केली होती. कुरिअर सेवेचा वापर करून ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड किंग्डममध्ये ८ कोटी रुपये किमतींच्या केटामाइन आणि व्हायग्राची तस्करी केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. अली असगर शिराझी या वाँटेड व्यक्तीला दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात मुंबई विमानतळावरुन पकडण्यात आले होते. गुन्हे शाखेने त्याच्याविरुद्ध जारी केलेला एलओसी आणि त्यानंतर त्याला यावर्षी ताब्यात घेण्यात आले आहे.


अली असगर शिराझीशी संबंधित सात ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत आणि काही इतर ठिकाणी छापे अजुनही सुरू आहेत. या वर्षी मे महिन्यात अली असगरला अटक करण्यापूर्वी अँटी एक्सटॉर्शन सेलने (AEC) मार्चमध्ये शिराझीचा शोध सुरू केला आणि पोलिसांच्या पथकाने त्याच्या शोधासाठी जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि देशातील अनेक ठिकाणी भेट दिली. परंतु तो सतत त्याचे गंतव्यस्थान बदलत होता. अखेर पोलिसांच्या तावडीत तो सापडलाच.


एअर कार्गोमध्ये लपवून आठ कोटी रुपयांच्या केटामाइनची ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने मुख्य अली असगर शिराझी याला अटक केली होती.


गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं १५ मार्च रोजी अंधेरी परिसरात छापा टाकून १५ किलो ७४० ग्रॅम केटामाइन आणि २३ हजारांहून अधिक व्हायग्राची पाकिटं जप्त केली होती. केटामाइनची किंमत सात कोटी ८७ लाख रुपये, तर व्हायग्राची किंमत ५८ लाख रुपये होती.


याप्रकरणात आत्तापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीचा म्होरक्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर कैलाश राजपूत असून, त्याच्यासह आणखी तिघांविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. कैलाश राजपूत याच्या टोळीतील अली असगर शिराझी हा महत्त्वाचा आणि टोळीची जबाबदारी असलेला सदस्य. गुन्हा दाखल झाल्यानंतर अली असगर शिराझी गायब झाला होता.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

BMC News : मुंबई रेबीज निर्मूलनासाठी महानगरपालिका आणि मिशन रेबीज इंडिया यांच्यात सामंजस्य करार

मुंबई : मुंबईतील (Mumbai) भटके श्वान (Dogs) व मांजरींचे (Cats) लसीकरणासाठी तसेच ‘रेबीजमुक्त मुंबई’ करण्यासाठी मुंबई

Chandrashekhar Bawankule : शेती, शेतरस्त्याच्या भांडणात आता ई-मेलवर मिळालेली नोटीस ग्राह्य

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय; बाधित शेतकऱ्यांना मिळणार 'मोफत' पोलीस संरक्षण मुंबई : ग्रामीण

Devendra Fadnavis : नीती आयोगाच्या निर्देशांकांवर पुढील ४ वर्षांत परिणामकारक कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

Pavana Dam : पवना धरण ९३ टक्क्यांहून अधिक भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मावळ : मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

Ashadhi Wari Charan Seva : ‘चरणसेवा’ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; १४ जिल्ह्यांतील ४.९६ लाख वारकऱ्यांना थेट लाभ

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा २४ जुलै रोजी समारोप; १४०

Maharashtra Cyber ​​Cell : महाराष्ट्र सायबर सेल कात टाकणार

- केंद्र सरकारच्या धर्तीवर 'हायटेक' रचना; सर्व यंत्रणा येणार एका छताखाली मुंबई : वाढत्या सायबर गुन्ह्यांवर वेगाने