Fire: पुण्यात कंटेनरला लागलेल्या भीषण आगीत ४ जणांचा होरपळून मृत्यू

  96

पुणे: मुंबई-बंगळुरू महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळ सोमवारी रात्री धावत्या कंटेनरला आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेले हे चारही लोक एकाच कुटुंबातील असल्याची शक्यता आहे.


या मार्गावर एका कंटेरनने दुसऱ्या कंटेनला धडक दिली. यामुळे एका कंटेनरने पेट घेतला. ही आग इतकी भीषण होती की यात कंटेनरचे केबिन जळून खाक झाले. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.


 


या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरच्या नर्हे येथील स्वामीनारायण मंदिराजवळ रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारासस मुंबईच्या दिशेने निघालेल्या ट्रंकला भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. यामुळे कंटेनर पलटी झाला. या ट्रकने आणखी एका गाडीला धडक दिल्यामुळे या ट्रकला आग लागली.


यावेळी केबिनमधील सहा जणांपैकी दोघांनी गाडीतून उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला मात्र चार जणांना गाडीतून बाहेरच पडता न आल्याने त्यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला.

Comments
Add Comment

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

नियमितपणे आढावा, समन्वय साधणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई : राज्यातील पाच

माधुरी लवकरच कोल्हापूरला परतणार!

कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश; माधुरीला परत पाठवण्याबाबत वनताराकडून आश्वासन कोल्हापूर: कोल्हापूरकरांच्या

उत्तराखंडमधील ढगफुटीत अडकले महाराष्ट्रातील ५१ पर्यटक

सर्व पर्यटक सुखरूप असल्याची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती मुंबई : उत्तराखंडमधील राज्यातील उत्तरकाशी

Hingoli Train Fire : हिंगोली रेल्वे स्थानकावर उभ्या बोगीला भीषण आग; संपूर्ण बोगी जळून खाक

हिंगोली : हिंगोली शहरातील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका जुन्या बोगीला बुधवारी (६ ऑगस्ट) सकाळी सुमारे ८:३०

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश, कोकण रेल्वेच्या रो - रो कार सेवेला नांदगावात थांबा

कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय संघर्ष समितीने देखील वेधले होते लक्ष मुंबईकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना