Fire: पुण्यात कंटेनरला लागलेल्या भीषण आगीत ४ जणांचा होरपळून मृत्यू

पुणे: मुंबई-बंगळुरू महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळ सोमवारी रात्री धावत्या कंटेनरला आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेले हे चारही लोक एकाच कुटुंबातील असल्याची शक्यता आहे.


या मार्गावर एका कंटेरनने दुसऱ्या कंटेनला धडक दिली. यामुळे एका कंटेनरने पेट घेतला. ही आग इतकी भीषण होती की यात कंटेनरचे केबिन जळून खाक झाले. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.


 


या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरच्या नर्हे येथील स्वामीनारायण मंदिराजवळ रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारासस मुंबईच्या दिशेने निघालेल्या ट्रंकला भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. यामुळे कंटेनर पलटी झाला. या ट्रकने आणखी एका गाडीला धडक दिल्यामुळे या ट्रकला आग लागली.


यावेळी केबिनमधील सहा जणांपैकी दोघांनी गाडीतून उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला मात्र चार जणांना गाडीतून बाहेरच पडता न आल्याने त्यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा