Fire: पुण्यात कंटेनरला लागलेल्या भीषण आगीत ४ जणांचा होरपळून मृत्यू

पुणे: मुंबई-बंगळुरू महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळ सोमवारी रात्री धावत्या कंटेनरला आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेले हे चारही लोक एकाच कुटुंबातील असल्याची शक्यता आहे.


या मार्गावर एका कंटेरनने दुसऱ्या कंटेनला धडक दिली. यामुळे एका कंटेनरने पेट घेतला. ही आग इतकी भीषण होती की यात कंटेनरचे केबिन जळून खाक झाले. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.


 


या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरच्या नर्हे येथील स्वामीनारायण मंदिराजवळ रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारासस मुंबईच्या दिशेने निघालेल्या ट्रंकला भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. यामुळे कंटेनर पलटी झाला. या ट्रकने आणखी एका गाडीला धडक दिल्यामुळे या ट्रकला आग लागली.


यावेळी केबिनमधील सहा जणांपैकी दोघांनी गाडीतून उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला मात्र चार जणांना गाडीतून बाहेरच पडता न आल्याने त्यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला.

Comments
Add Comment

Thane-CSMT : ठाणे ते सीएसएमटी प्रवास सुसाट! १५० कोटींच्या नव्या समांतर पुलामुळे 'शीव'ची कोंडी फुटणार; मार्ग कसा असेल?

मुंबई : मुंबईतील सर्वात गजबजलेल्या आणि वाहतूककोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शीव (Sion) परिसरातील प्रवाशांसाठी एक

Special Trains :नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून धावणार विशेष गाड्या

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५

पुण्यात डिजिटल अरेस्टची धमकी देत, ज्येष्ठ नागरिकाची कोटींची फसवणूक

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाला कोट्यवधींचा

नाशिक महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग; भाजपमधील तीन प्रभावी चेहरे चर्चेत

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीनंतर नाशिकच्या सत्तावर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्पष्ट संख्याबळासह

Amrit Bharat Express Train Routes : मुंबईकरांची चांदी! 'अमृत भारत एक्सप्रेस'ने लांब पल्ल्याचा प्रवास होणार स्वस्त; जाणून घ्या कुठे-कुठे थांबणार गाडी?

मुंबई : भारतीय रेल्वेने सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी सुरू केलेल्या 'अमृत भारत एक्सप्रेस' ताफ्यात आता आणखी ९

Ashish Jaiswal : आमदार आशिष जयस्वाल यांच्या पाठपुराव्याला यश; प्रकल्पबाधित तरुण दिनेश हावरे यांचा पोलीस सेवेतील मार्ग मोकळा!

सातारा : नियम आणि प्रशासकीय तांत्रिकतेच्या कचाट्यात अडकलेल्या एका होतकरू तरुणाच्या आयुष्यात अखेर आशेचा नवा