Fire: पुण्यात कंटेनरला लागलेल्या भीषण आगीत ४ जणांचा होरपळून मृत्यू

पुणे: मुंबई-बंगळुरू महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळ सोमवारी रात्री धावत्या कंटेनरला आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेले हे चारही लोक एकाच कुटुंबातील असल्याची शक्यता आहे.


या मार्गावर एका कंटेरनने दुसऱ्या कंटेनला धडक दिली. यामुळे एका कंटेनरने पेट घेतला. ही आग इतकी भीषण होती की यात कंटेनरचे केबिन जळून खाक झाले. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.


 


या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरच्या नर्हे येथील स्वामीनारायण मंदिराजवळ रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारासस मुंबईच्या दिशेने निघालेल्या ट्रंकला भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. यामुळे कंटेनर पलटी झाला. या ट्रकने आणखी एका गाडीला धडक दिल्यामुळे या ट्रकला आग लागली.


यावेळी केबिनमधील सहा जणांपैकी दोघांनी गाडीतून उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला मात्र चार जणांना गाडीतून बाहेरच पडता न आल्याने त्यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला.

Comments
Add Comment

मतदानाच्या तोंडावर २० जिल्ह्यांत तारखांमध्ये बदल

नगर परिषदांसाठी २ ऐवजी २० डिसेंबरला मतदान राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय बारामती, मंगळवेढ्यासह अनेक नगर

पुण्यातील पंचतारांकीत हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांची धावपळ, कॉल करणारा जेरबंद

पुणे : कोरेगाव पार्कमधील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर शुक्रवारी

Pune Crime : मैत्रिणीची हत्या करून तरुणाची आत्महत्या! पुण्यात दुहेरी हत्याकांड; संगमवाडी परिसरात थरार, तरुणाचे खळबळजनक पाऊल

पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हत्या,

IMD Weather Update : हाय अलर्ट जारी! 'डिटवाह' चक्रीवादळामुळे पुढील ४८ तास धोक्याचे; अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

यंदा देशासह महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले. संपूर्ण देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

हिंजवडी-वाघोली वाहतूक कोंडीला ब्रेक; PMRDAचा नवा मास्टरप्लॅन जाहीर

पुणे : पुणे महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी PMRDA ने मोठी पावले उचलली आहेत. हिंजवडी,

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या विशेष अनारक्षित गाड्या

मुंबई : मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी अनुयायांसाठी ४ डिसेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत १५ विशेष