Accident: समृद्धी अपघात प्रकरण, चालकासह दोन आरटीओ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर: शनिवारी समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात(accident) १२ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २३ जण जखमी झालेत. या अपघाताप्रकरणी चालकासह दोन आरटीओ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तीनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली.


दरम्यान, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या या दोनही आरटीओ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असल्याचीही माहिती आरटीओच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास बुलढाणा येथून नाशिककडे जाणाऱ्या मिनी ट्रॅव्हल्स बसला समृद्धी महामार्गावर मोठा अपघात झाला. या बसमधील भाविक हे सैलानी बाबांचे दर्शन घेऊन परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.


या मार्गावर आरटीओच्या अधिकाऱ्यांनी ट्रक थांबवला होता. याचवेळेस ही मिनी ट्र्रॅव्हल बस मागून आली आणि तिची जोरदार धडक या ट्रकला बसली. ही धडक इतकी भीषण होती की गाडीतील १२ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २३ जण गंभीर जखमी झाले.


प्रदीप छबुराव राठोड आणि नितीनकुमार गणोरकर अशी कारवाई करण्यात आलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांची नावे आहेत तर ब्रिजेशकुमार कमलसिंग चंदेल असे या चालकाचे नाव आहे त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



घटनेचा व्हिडीओ आला समोर


अपघात झालेल्या ट्रॅव्हल बसमधील प्रवासी बुलढाणा येथील सैलानी बाबाचे दर्शन घेऊन परतत होते. समृद्धी महामार्गावर असताना आरटीओच्या अधिकार्‍यांनी एक ट्रक चौकशीसाठी रस्त्यात थांबवून ठेवला होता. मागून येणार्‍या बसचालकाला हा ट्रक थांबला आहे की सुरु आहे याचा अंदाज न आल्याने बस ट्रकला धडकली आणि अपघात झाला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.


व्हिडीओतून अपघात होण्याच्या काही वेळ आधीच हा ट्रक थांबवल्याचे दिसत आहे. शिवाय भर रस्त्यातच ट्रकची चौकशी सुरु आहे. आरटीओ अधिकार्‍यांनी ट्रक अडवला नसता किंवा चौकशीसाठी ट्रक महामार्गाच्या कडेला थांबवला असता तर संभाव्य अपघात टळला असता. त्यामुळे आरटीओच्या चुकीमुळे १२ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर