Mumbai airport news : मुंबई विमानतळ उद्या सहा तासांसाठी बंद; काय आहे कारण?

मुंबई : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) १७ ऑक्टोबरला ६ तासांसाठी बंद (Mumbai Airport Shut) ठेवण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विमानतळ बंद असणार आहे. या सहा तासांदरम्यान मुंबई विमानतळावरून कोणतंही उड्डाण होणार नाही.


छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) वार्षिक प्रतिबंधात्मक देखभालीसाठी हे विमानतळ उद्या सहा तासांसाठी तात्पुरतं बंद करण्यात येणार आहे. या ठिकाणच्या दोन्ही धावपट्टीवर देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.


अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावरील या नियोजित तात्पुरत्या बंदचा प्राथमिक उद्देश विमानतळाच्या पायाभूत सुविधा सुधारून त्यांचा सर्वोत्तम दर्जा राखणे आहे. या काळात आवश्यक असलेली दुरुस्ती आणि देखभाल कामे करण्यात येतील. यासंबंधी एअरमेन, एअरलाइन्स आणि इतर संबंधितांना सहा महिने अगोदर नोटीस जारी करण्यात आली आहे.



निवेदनात काय म्हटले आहे?


विमानतळ ऑपरेटरच्या निवेदनानुसार सांगण्यात आलं आहे की, 'सीएसएमआयएच्‍या (CSMIA) पावसाळ्यानंतरच्या सर्वसमावेशक धावपट्टी देखभाल योजनेचा एक भाग म्हणून, दोन्ही रनवे RWY 09/27 आणि RWY 14/32 हे १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० ते १७:०० वाजेपर्यंत तात्पुरते नॉन-ऑपरेशनल राहतील.' निवेदनात पुढे म्हटलं आहे की, 'सीएसएमआयए (CSMIA) ने सर्व महत्त्वाच्या विभागांच्या सहकार्याने देखभालीचं काम सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी प्रभावीपणे उड्डाणे निर्धारित केली आहेत. सीएसएमआयएला प्रवाशांकडून सहकार्य आणि पाठिंबा अपेक्षित आहे."



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Mumbai Rain : मुंबईत वर्षभराच्या तुलनेत सरासरी ७६ टक्के पडला पाऊस

मुंबई : मुंबईत (Mumbai) आतापर्यंत वर्षभराच्या तुलनेत सरासरी ७५ ते ७६ टक्के एवढ्या पावसाची (Rain) नोंद झाल्याची आकडेवारी

BMC Schools : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत ८० टक्के शालेय साहित्याचे वाटप

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) शाळांमध्ये (Schools) शालेय विद्यार्थ्यांना (Students) दरवर्षी २७ शैक्षणिक वस्तुंचे मोफत वाटप

BMC : तब्बल १२७८ महिलांमध्ये स्तन कर्करोगाची आढळली लक्षणे, महापालिकेच्यावतीने केला जाणार मोफत उपचार

महापालिका सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी दिली माहिती मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री

Mumbai Water Supply : मुंबईकरांचा पाणी साठा सुस्थितीत, आता प्रतीक्षा ऑगस्टमधील पावसाची

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा (Water Supply) करणाऱ्या सर्व धरणांमधील पाणी साठा आता चांगल्याप्रकारे वाढू लागला असून

Ashadhi Ekadashi : वडाळा येथील 'प्रतिपंढरपूर' विठ्ठल मंदिरात मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते महापूजा आणि महाअभिषेक संपन्न

मुंबईकरांच्या सुख-समृद्धीसह महानगराच्या सर्वांगीण विकासासाठी विठुरायाच्या चरणी प्रार्थना वडाळा : आषाढी

Amravati : राज्यात खरीप पेरण्यांना वेग; २० जुलैअखेर ७४ टक्के पेरणी पूर्ण, अमरावती विभाग आघाडीवर

मुंबई : जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यभरातील खरीप हंगाम धोक्यात आला होता. वेळेवर पाऊस न झाल्याने