Saptashrungi Navratri : सप्तशृंगी गडावर नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी तीस हजार भाविकांची उपस्थिती

  285

व्हीआयपींच्या वाढत्या गर्दीमुळे सर्वसामान्य भाविकांची नाराजी


नाशिक : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्ती पीठ म्हणून ओळखले जाणाऱ्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील नवरात्र उत्सवास आजपासून प्रारंभ झाला आहे. आईच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणावरून हजारो भक्तांनी सप्तशृंगी गडावर गर्दी केली होती. आज सकाळपासून ते दुपारपर्यंत जवळपास तीस हजार भाविक भगवतीच्या चरणी नतमस्तक झाले. पहिल्या दिवसाचे नवरूप बघण्यासाठी भक्तांनी आज गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.


शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सप्तशृंगी मातेच्या पहिल्या महापूजेचा मान संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष, नाशिक जिल्ह्याचे प्रधान, जिल्हा सत्र न्यायाधीश एच डी जलामनी, नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांना मिळाला. उभय महानुभवांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली. अकरा वाजता शारदे नवरात्र उत्सवानिमित्त १,१११ घटांची स्थापना करण्यात आली.


मंदिरात जाण्यासाठी ५२० पायऱ्या चढून गेल्यानंतर बारा ठिकाणी बारी लावण्यात आली आहे. मंदिरामध्ये पायऱ्यांवरती ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच प्रवेशद्वाराजवळ नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. देवी संस्थानतर्फे भक्तांसाठी मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. गावाच्या दीड किलोमीटर अंतरावर ती मेळा बस स्थानकातून भाविकांसाठी परिवहन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दीड किलोमीटर अंतरावरून भावी भक्तांना गावात प्रवेश दिला जात आहे. सप्तशृंगी गडावर भक्तांना सुलभ दर्शन होण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तासह संस्थानाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.



व्हिआयपी वर्दळीमुळे भाविकांची कुचंबना


सप्तशृंगी गडावर विराजमान झालेली आई भगवती खान्देश आणि गुजरात मधील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. खान्देश हे आईचे माहेर मानले जात असून या परिसरासह गुजरात मध्ये स्थायिक झालेले खान्देशवासीय तसेच गुजरातचे भाविक नवरात्रौत्सवात आईच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. हजारो भाविक आठ आठ दिवस पदयात्रा करून आईच्या दर्शनासाठी आल्यानंतर व्हिआयपी लोकांना आधी दिल्या जाणार्‍या दर्शनामुळे या भाविकांची अनेकदा अडवणूक होते. यावर भाविक नाराजी व्यक्त करताना दिसले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक