Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू

मुंबई: समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. याच महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे. देवदर्शन करून परतत असलेल्या भाविकांवर काळाचा घाला घातला गेला. या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला तर २३ जण जखमी झाले आहेत.


हे भाविक सैलानी येथील दर्ग्यावरून परतत होते. त्या दरम्यान या महामार्गावरील वैजापूरच्या जांबरगाव टोलनाक्याजवळ ही दुर्घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. जांबरगाव टोलनाक्याजवळ ट्रव्हल्स बस आणि ट्रक यांच्यात मोठा अपघात झाला. या अपघातात दहा ते बारा जण जागीच मृ्त्यूमुखी पडले.


या बसमधील हे प्रवासी सैलानी बाबा येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन परतत होते. त्याचवेळेस हा भीषण अपघात झाला. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.


समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगाने येणाऱ्या टॅव्हल्सच्या बसने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या समोरच्या भागाचा पूर्ण चेंदामेंदा झाला. अपघाताची बातमी कळताच तातडीने तेथे मदतकार्य पोहोचवण्यात आले. या अपघातातील जखमींना छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

Comments
Add Comment

मुंबई मेट्रो-३ साठी WhatsApp तिकीट सेवा सुरू; आता ॲपची गरज नाही!

'हाय' मेसेज करा आणि QR तिकीट मिळवा; MMRC चा प्रवाशांना 'स्मार्ट' दिलासा मुंबई: मुंबईतील लोकल प्रवाशांची सोय लक्षात घेऊन

भायखळा वस्र संग्रहालय ठरणार आता नवीन पर्यटन स्थळ

मुंबई (खास प्रतिनिधी) : संस्कृती, इतिहास आणि आधुनिकतेचा अनोखा संगम असलेले मुंबई महानगर देश-विदेशातील

एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी बोनस, संप टळला!

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध विभागातील कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला होता. मात्र,

Mumbai Politics : राऊत नेमके काय म्हणाले? राऊतांच्या 'त्या' विधानाने ठाकरेंच्या युतीत मिठाचा खडा?

राऊतांच्या 'त्या' विधानावर मनसे नेत्यांची तीव्र नाराजी; मनसे 'शिवतीर्थ'वर आक्रमक! मुंबई: ठाकरे बंधू म्हणजेच

घाटकोपरमधील गोल्डक्रेस्ट बिझनेस पार्कला लागली भीषण आग; बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबईतील घाटकोपर पश्चिम भागात असलेल्या गोल्डक्रेस्ट बिझनेस पार्क या नामांकित व्यावसायिक इमारतीत आज

मुंबईकरांनो लक्ष द्या! 'या' तांत्रिक बिघाडामुळे मुंबईचा पाणीपुरवठा विस्कळीत; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

पाणीटंचाईचं संकट! मुंबई, ठाणे आणि भिवंडीच्या काही भागांना फटका, नागरिकांनी पाणी जपून वापरा मुंबई: मुंबईसह