Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू

मुंबई: समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. याच महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे. देवदर्शन करून परतत असलेल्या भाविकांवर काळाचा घाला घातला गेला. या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला तर २३ जण जखमी झाले आहेत.


हे भाविक सैलानी येथील दर्ग्यावरून परतत होते. त्या दरम्यान या महामार्गावरील वैजापूरच्या जांबरगाव टोलनाक्याजवळ ही दुर्घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. जांबरगाव टोलनाक्याजवळ ट्रव्हल्स बस आणि ट्रक यांच्यात मोठा अपघात झाला. या अपघातात दहा ते बारा जण जागीच मृ्त्यूमुखी पडले.


या बसमधील हे प्रवासी सैलानी बाबा येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन परतत होते. त्याचवेळेस हा भीषण अपघात झाला. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.


समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगाने येणाऱ्या टॅव्हल्सच्या बसने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या समोरच्या भागाचा पूर्ण चेंदामेंदा झाला. अपघाताची बातमी कळताच तातडीने तेथे मदतकार्य पोहोचवण्यात आले. या अपघातातील जखमींना छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी, पावसाळ्याआधी हे उड्डाणपूल सुरू होणार, मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार

मुंबई : राज्याच्या राजधानीतील वाहतूक कोंडीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. मुंबईतील सात उड्डाणपुलांचे काम

महाराष्ट्रात ई वाहनांना चालना देण्यासाठी कोट्यवधींच्या निधीचे वितरण

मुंबई : राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवून पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी महाराष्ट्र

अवैध प्रवासी वाहतुकीवर आळा घालण्यासाठी कडक भूमिका घेणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : राज्यातील वाढत्या अवैध प्रवासी वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या

Nitish Kumar: नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही झेड+ सुरक्षा राहणार; नेमकं कारण काय?

नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपद

BMC News : मुंबईतील सर्व ऑक्सिजन प्लांटचे ऑडीट करा; स्थायी समितीने दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) कोविड काळात मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये तसेच कोविड

BMC News : वाणीतून नाहीतर भाजपाने करून दाखवले; सुमारे २७० कोटी रूपयांची बचत करत गारगाई पाणी प्रकल्पाला दिली मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) स्थायी समितीने फेरविचारासाठी पाठवून दिलेला गारगाई पाणी प्रकल्पाला अखेर स्थायी समितीने