Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू

मुंबई: समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. याच महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे. देवदर्शन करून परतत असलेल्या भाविकांवर काळाचा घाला घातला गेला. या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला तर २३ जण जखमी झाले आहेत.


हे भाविक सैलानी येथील दर्ग्यावरून परतत होते. त्या दरम्यान या महामार्गावरील वैजापूरच्या जांबरगाव टोलनाक्याजवळ ही दुर्घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. जांबरगाव टोलनाक्याजवळ ट्रव्हल्स बस आणि ट्रक यांच्यात मोठा अपघात झाला. या अपघातात दहा ते बारा जण जागीच मृ्त्यूमुखी पडले.


या बसमधील हे प्रवासी सैलानी बाबा येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन परतत होते. त्याचवेळेस हा भीषण अपघात झाला. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.


समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगाने येणाऱ्या टॅव्हल्सच्या बसने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या समोरच्या भागाचा पूर्ण चेंदामेंदा झाला. अपघाताची बातमी कळताच तातडीने तेथे मदतकार्य पोहोचवण्यात आले. या अपघातातील जखमींना छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात