'ऑपरेशन अजय' आतापर्यंत ४४७ भारतीयांची इस्रायलमधून सुटका

  86

दुसऱ्या फ्लाइटमध्ये २३५ लोक मायभूमीत पोहोचले


नवी दिल्ली : ऑपरेशन अजयचे दुसरे विमान शनिवारी सकाळी दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) पोहोचले. या विमानात २३५ भारतीय नागरिक मायभूमीत परतले आहेत. त्यांना इस्रायलमधून (Israel) सुखरूप परत आणण्यात आले आहे.


ऑपरेशन अजय अंतर्गत आतापर्यंत ४४७ भारतीयांना इस्रायलमधून बाहेर काढण्यात आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री राजकुमार रंजन यांनी इस्रायलहून परतलेल्या नागरिकांचे विमानतळावर स्वागत केले.





ऑपरेशन अजय अंतर्गत दुसऱ्या फ्लाइटने शुक्रवारी रात्री ११.०२ वाजता स्थानिक वेळेनुसार (इस्रायल) उड्डाण केले. इस्रायलमधून भारतीयांना बाहेर काढण्याची मोहीम सुरूच राहणार आहे. इस्रायलमध्ये सुमारे १८,००० भारतीय नागरिक राहतात.





याआधी इस्रायलमधून भारतीय नागरिकांच्या परतीच्या सोयीसाठी, पहिले चार्टर विमान गुरुवारी संध्याकाळी उशिरा बेन गुरियन विमानतळावरून भारतासाठी रवाना झाले. शुक्रवारी सकाळी ते भारताची राजधानी दिल्लीला पोहोचले. पहिल्या विमानात २१२ भारतीय नागरिक होते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Comments
Add Comment

Cloudburst Updates : एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर, भूस्खलन अन् ३० जण... हिमाचल प्रदेशात हाहाकार

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशात नैसर्गिक संकटाने तेथील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. अनेक रस्ते भूस्खलनाने बंद

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे