‘ऑपरेशन अजय’ आतापर्यंत ४४७ भारतीयांची इस्रायलमधून सुटका

Share

दुसऱ्या फ्लाइटमध्ये २३५ लोक मायभूमीत पोहोचले

नवी दिल्ली : ऑपरेशन अजयचे दुसरे विमान शनिवारी सकाळी दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) पोहोचले. या विमानात २३५ भारतीय नागरिक मायभूमीत परतले आहेत. त्यांना इस्रायलमधून (Israel) सुखरूप परत आणण्यात आले आहे.

ऑपरेशन अजय अंतर्गत आतापर्यंत ४४७ भारतीयांना इस्रायलमधून बाहेर काढण्यात आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री राजकुमार रंजन यांनी इस्रायलहून परतलेल्या नागरिकांचे विमानतळावर स्वागत केले.

ऑपरेशन अजय अंतर्गत दुसऱ्या फ्लाइटने शुक्रवारी रात्री ११.०२ वाजता स्थानिक वेळेनुसार (इस्रायल) उड्डाण केले. इस्रायलमधून भारतीयांना बाहेर काढण्याची मोहीम सुरूच राहणार आहे. इस्रायलमध्ये सुमारे १८,००० भारतीय नागरिक राहतात.

याआधी इस्रायलमधून भारतीय नागरिकांच्या परतीच्या सोयीसाठी, पहिले चार्टर विमान गुरुवारी संध्याकाळी उशिरा बेन गुरियन विमानतळावरून भारतासाठी रवाना झाले. शुक्रवारी सकाळी ते भारताची राजधानी दिल्लीला पोहोचले. पहिल्या विमानात २१२ भारतीय नागरिक होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

5 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

5 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

6 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

8 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

8 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

8 hours ago