Mira Road Firing : बेकरीत शिरला, दुकानदारावर बंदूक रोखली, आणि...

मीरा रोडच्या बेकरी दुकानात नेमकं काय घडलं?


भाईंदर : मीरा रोड येथे काशीमीरा पोलिस ठाण्यासमोरच असलेल्या इंटरनॅशनल बेकिंग कंपनी नावाच्या बेकरीत आज सकाळी गोळीबाराचा प्रयत्न झाला. एका तरुणाने दुकानदारावर बंदूक रोखल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक हेल्मेट घातलेला तरुण दुकानात शिरला आणि त्याने दुकानदारांवर बंदूक रोखली परंतु तो गोळीबार करू शकला नाही म्हणून त्याने काही न बोलताच दुकानातून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून त्या भागातील वातावरण तंग झाले आहे. पोलिस उपायुक्त जयंत बजबळे तसेच काशीमीरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप कदम यांनी घटनास्थळाला भेट दिली असून पोलिस त्या इसमाचा शोध घेत आहेत.


सदर दुकान अनेक गुन्हे दाखल असलेल्या या भागातील पटेल कुटुंबीयांचे आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू असून गुटखा, जमिनीचा वाद, दहशत पसरवणे असे अनेक तर्कवितर्क लावून पाहिले जात आहेत. पोलीस सर्व बाबी तपासून पाहत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या