Firing: सियालदह राजधानी एक्सप्रेसमध्ये गोळीबार, आरोपीला अटक

नवी दिल्ली : सियालदह एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरूवारची आहे. गोळीबारानंतर या त्याव्यक्तीला रेल्वेतून उतरवून अटक करण्यात आली आहे. रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही.


गोळीबार करताना ही व्यक्ती नशेत तर नव्हती ना याचा शोध पोलीस घेत आहेत.यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.


या घटनेदरम्यान सियालदह राजधानी एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असलेल्या वकीलाने सांगितले की अचानक घडलेल्या या घटनेने सारेच प्रवासी प्रचंड घाबरले. संपूर्ण ट्रेनची तपासणी केली जावी अशी त्यांची इच्छा होती.



जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्येही घडली होती घटना


अशाच पद्धतीचे प्रकरण जुलैमध्येही समोर आले होते. तेव्हा पालघर स्टेशनजवळ जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. ३१ जुलैला रेल्वे सुरक्षा दलातील माजी कॉन्स्टेबल चेतन सिंह चौधरी यांनी वरिष्ठ अधिकारी टीकाराम मीना आणि रेल्वेतील तीन अन्य प्रवाशांची गोळी घालून हत्या केली होती.


या प्रकरणी चौधरीवर या गुन्ह्या वापरल्या गेलेल्या हत्यारासह अटक करण्यात आली होती आणि त्याच्याविरोधात हत्या आणि अपहरणाची केसही दाखल करण्यात आली होती. याशिवाय चौधरीवर धर्माच्या आधारावर गटादरम्यान विरोध भडकावण्याचा आरोपही करण्यात आला होता.

Comments
Add Comment

अमेरिकेने रंग दाखवला मग भारतासाठी चीन उभा राहिला, चीनने थेट भारताचा झेंडा पोस्ट करत म्हटले....

Donald Trump on India: बाळ जन्माला येते आणि लगेच अमेरिकन नागरिक होते, 'इथे एका मूलाला लगेच नागरिकत्व मिळते आणि ते संपूर्ण

लग्नाच्या 10 दिवस आधी होणाऱ्या बायकोचं मोठं कांड समोर आलं, बॉयफ्रेंडने नको नको ते सर्वच सांगितलं

मध्यप्रदेश : लग्न हा आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय समजला जातो. जर जोडीदार योग्य असेल तर पुढील आयुष्य

India - Nepal Border : नेपाळकडून सीमेवर नवीन कडक नियम; भारतीय प्रवाशांवर परिणाम

भारत-नेपाळ सीमेवरील प्रवास आणि व्यवहारांमध्ये मोठे बदल झाले असून नेपाळ सरकारने भारतीय प्रवाशांसाठी नवीन व कडक

Heatwave in Odisha : ओडिशात उष्णतेचा कहर; झारसुगुडा ठरले देशातील सर्वाधिक तापमानाचे शहर

देशात सध्या उष्णतेची तीव्र लाट उसळली असून ओडिशा राज्य या उष्णतेच्या तडाख्यात सापडले आहे. किनारपट्टीपासून ते

Online Gaming Sector : ऑनलाइन गेमिंग क्षेत्रासाठी १ मेपासून नवा कायदा

देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑनलाइन गेमिंग क्षेत्राला नियमनात आणण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले

Bengal Election 2026 : बंगाल निवडणुकीला हिंसक वळण : कुठे कार्यकर्त्यांवर हल्ले तर कुठे ईव्हीएम वादामुळे वातावरण तापले

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना