Firing: सियालदह राजधानी एक्सप्रेसमध्ये गोळीबार, आरोपीला अटक

नवी दिल्ली : सियालदह एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरूवारची आहे. गोळीबारानंतर या त्याव्यक्तीला रेल्वेतून उतरवून अटक करण्यात आली आहे. रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही.


गोळीबार करताना ही व्यक्ती नशेत तर नव्हती ना याचा शोध पोलीस घेत आहेत.यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.


या घटनेदरम्यान सियालदह राजधानी एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असलेल्या वकीलाने सांगितले की अचानक घडलेल्या या घटनेने सारेच प्रवासी प्रचंड घाबरले. संपूर्ण ट्रेनची तपासणी केली जावी अशी त्यांची इच्छा होती.



जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्येही घडली होती घटना


अशाच पद्धतीचे प्रकरण जुलैमध्येही समोर आले होते. तेव्हा पालघर स्टेशनजवळ जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. ३१ जुलैला रेल्वे सुरक्षा दलातील माजी कॉन्स्टेबल चेतन सिंह चौधरी यांनी वरिष्ठ अधिकारी टीकाराम मीना आणि रेल्वेतील तीन अन्य प्रवाशांची गोळी घालून हत्या केली होती.


या प्रकरणी चौधरीवर या गुन्ह्या वापरल्या गेलेल्या हत्यारासह अटक करण्यात आली होती आणि त्याच्याविरोधात हत्या आणि अपहरणाची केसही दाखल करण्यात आली होती. याशिवाय चौधरीवर धर्माच्या आधारावर गटादरम्यान विरोध भडकावण्याचा आरोपही करण्यात आला होता.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी