Chitra Wagh : मोठ्ठ्या ताई, तुम्हाला फक्त १०० कोटीत रस आहे...

भाजपच्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर जहरी टीका


मुंबई : राष्ट्रवादीच्या (NCP) दोन गटांतील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मात्र, पवार कुटुंबीय कधी एकमेकांच्या विरोधात बोलतात तर कधी एकमेकांची बाजू घेतात. अशातच राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज एक वक्तव्य केलं. अजितदादा (Ajit Pawar) मुख्यमंत्री झाले तर पहिला हार मीच घालेन, मात्र आपल्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्याच्या सुरक्षेसाठी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) गृहमंत्री बनवू नये, असं ते वक्तव्य होतं. यावर आता भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा आणि धडाडीच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही तितकेच चोख प्रत्युत्तर दिले आहे.


चित्रा वाघ यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करत सुप्रिया सुळेंवर तिखट शब्दांत टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे, राज्याच्या मोठ्ठ्या ताई, सुप्रियाताई. १०० कोटी रुपये वसुली करून देणारा गृहमंत्रीच तुम्हाला आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? त्यामुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा गृहमंत्री तुम्हाला आवडणारच नाही.


पुढे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत, महिलांच्या बेपत्ता प्रकरणात संपूर्ण देशातील आणि अगदी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील परिस्थिती सभागृहात सांगून तुमचे समाधान होणार नाही, कारण... ससून प्रकरणात ९ पोलिस निलंबित झाले, पण तुम्हाला तेही आवडले नसेल कारण... हेरंब कुलकर्णी हल्लाप्रकरणी आरोपींना बेड्या ठोकल्या, पण तेही तुम्हाला आवडले नसेल कारण... कारण मोठ्ठ्या ताई, तुम्हाला फक्त १०० कोटीत रस आहे. मग ते एकरी वांग्यातून असो की वसुली करून देणारा गृहमंत्री... अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.





तुम्हाला नक्की काय हवंय?


तुम्हाला आरोपींना लोणावळ्यात सरकारी इतमामात पळून जायला मदत करणारा गृहमंत्री हवाय? की उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवायला मदत करणारा, अशा पोलिसांना परत सेवेत घेणारा गृहमंत्री? मोठ्ठ्या ताई तुमची चॉईसच वेगळी आहे, त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? असं सडेतोड उत्तर चित्रा वाघ यांनी दिलं आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात