Kolhapur Ambabai Mandir : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दारात चप्पल स्टँडवरुन वाद

काय आहे नेमकं प्रकरण?


कोल्हापूर : कोल्हापूर येथील अंबाबाईच्या मंदिराबाहेर (Kolhapur Ambabai Mandir) खाजगी दुकानदारांनी लावलेल्या चप्पल स्टँडवरुन (Chappal Stand) मोठा वाद निर्माण झाला आहे. या मंदिराबाहेर अनेक खाजगी दुकानदारांनी आपले स्टॉल्स, चप्पल स्टँड लावलेले आहेत. आज महानगरपालिकेने कारवाई करत हे स्टँड हटवले. त्यामुळे या परिसरात मोठा गोंधळ झाला. शिवाय कोणतीही नोटीस न देता हे स्टँड हटवण्यात आले, असा आरोप खाजगी दुकानदारांनी केला आहे.


अंबाबाई मंदिराच्या भिंतीला लागून जे खाजगी चप्पल स्टँड होते ते काढण्यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केली. नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराची मूळ भिंत जशीच्या तशी दिसली पाहिजे या मागणीकरता हे पथक याठिकाणी दाखल झालं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांनी ही मागणी केली होती.


मंदिराच्या मूळ भिंतीलाच लागून हे स्टँड असल्याने मंदिराचं मूळ रुप झाकलं जात आहे, त्यामुळे हे स्टँड दुसरीकडे शिफ्ट करण्यात यावेत, अशी मागणी भाविकांनी केली होती. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने अधिकृतरित्या एक नवीन चप्पल स्टँड तयार करण्यात आलं होतं. या स्टँडचा वापर करण्यात यावा, असं आवाहन करण्यात आलं होतं. यामुळेच खाजगी दुकानदारांना त्या ठिकाणाहून हटवण्यात आलं. मात्र, याला खाजगी दुकानदारांनी प्रचंड विरोध केला आणि वादाची परिस्थिती निर्माण झाली.


अंबाबाई मंदिराच्या परिसरात चप्पल स्टँड लावणार्‍या महिलांनी कारवाई करणार्‍या पोलिसांवर आरोप केले. पोलिसांनी त्यांना मारल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आमचं अख्खं कुटुंब या दुकानांवर चालतं त्यामुळे आमची दुकाने हटवल्यास आम्ही जायचं कुठे, असा प्रश्न दुकानदारांनी उपस्थित केला. अनेक वर्षांपासून आमची दुकाने इथे आहेत, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Konkan Railway Monsoon Schedule : महत्वाची बातमी! कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक जाहीर; १५ जूनपासून होणार प्रवासात मोठा बदल

कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही

पोहायला गेलेल्या पाच जणांपैकी एकाचा धरणात बुडून मृत्यू ऐन ईदच्या दिवशीच घटना घडल्याने सर्वत्र हळहळ

चाळीसगाव तालुक्यातील पिराचे बोरखेडा येथील धरणात पोहायला गेलेल्या चाळीसगाव शहरातील पाच तरुणांपैकी एका तरुणाचा

Food and Drug Administration Raids : ‘आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर थेट कारवाई’; राज्यभर अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमेत ३३ आरोपींना अटक

मुंबई : राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी धडक कारवाई सुरू

क्षुल्लक वादा वरून प्रियकराणे प्रियसीला केली मारहाण . . .

पुणे : पिंपरी चिंचवड मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे . एका प्रियकराने आपल्या प्रियसीला एका कपड्या च्या दुकानात

कोणत्याही वाहतूकदारास कार्यादेश नाही; पुढील निर्णय न्यायालयाच्या आदेशानुसारच – अन्न नागरी पुरवठा विभाग

नवीन अन्नधान्य वाहतूक निविदांबाबत अन्न नागरी पुरवठा विभागाचा खुलासा मुंबई : राज्यातील अन्नधान्य वाहतूक निविदा

Weather :महाराष्ट्र सह इतर राज्यांना धोक्याचा इशारा . . . १००किमी प्रतिसर वेगाने येणार वादळी वारे ...

मुंबई : महाराष्ट्र सह इतर राज्यात वादळी वारे येण्याची शक्यता हवामान विभाग खात्याने दर्शवली आहे . वाढत्या