Nitesh Rane : संजय राऊतची ग्रामसेवक आणि पोलीस पाटील बनायची लायकी नाही

शिवसेनेच्या आमदारांना माझा सल्ला आहे की...


आमदार नितेश राणे यांनी सुनावले खडे बोल


मुंबई : उबाठाचे (Ubatha) मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्रातून मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांच्यावर सातत्याने टीका करण्यात येते. महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्यासाठी काम करणार्‍या महायुती (Mahayuti) सरकारबद्दल असं छापून आणणार्‍या सामनाच्या संपादकांना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी चांगलेच खडसावले आहे. आजच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या लायकीवर भाष्य करणार्‍या उबाठाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना नितेश राणे यांनी त्यांचीच लायकी दाखवून दिली.


नितेश राणे म्हणाले, सामना वर्तमानपत्रात आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची कॅपेसिटी आणि लायकी यावर लिहिलेलं आहे. पण खरं तर रश्मी ठाकरेंना सामनाचे संपादक बनवून, संजय राजाराम राऊतची लायकी काढली, असं आम्ही म्हणायचं का? ग्रामसेवक आणि पोलीस पाटील बनायची लायकी नसलेला संजय राजाराम राऊत २०१९ ला मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघत होता. शरद पवार आपलेच नाव चालवणार म्हणून आमदारांना फोन करायला लागला पण याच्या लायकी प्रमाणे २ ते ३ पेक्षा जास्त आमदार याच्या बैठकीला जमलेच नाहीत, हीच याची लायकी आहे, असं नितेश राणे म्हणाले.


राजाराम राऊत यांच्या मुलाला म्हणजे संजयचा बंधू सुनिल राऊत याची उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना लायकी ओळखली आणि म्हणून मविआ सरकारच्या मंत्रिमंडळात संजयने एवढा थयथयाट करुनही सुनिलला साधं राज्यमंत्री पण बनवलं नाही. पण राजाराम राऊत यांच्या कुटुंबियांमध्ये कॅपेसिटी आहे, हे मानलं पाहिजे. ती कॅपेसिटी आहे गरिबांची खिचडी चोरण्यात. कारण अख्ख्या कुटुंबांचं नाव खिचडी घोटाळ्यात आलं आहे. त्यामुळे तुझी आणि तुझ्या मालकाची आधी लायकी, कॅपेसिटी बघ आणि मग फडणवीस साहेबांबद्दल बोल, असे खडे बोल नितेश राणे यांनी सुनावले.



शिवसेनेच्या आमदारांना माझा सल्ला आहे की...


आमचा मित्रपक्ष शिवसेनेच्या आमदारांना मी सांगेन की तुम्ही शिंदेसाहेबांना त्रास देणार याला काही मर्यादा आहेत. कधी अॅडच्या निमित्ताने तर कधी काही वक्तव्यं करुन त्यांना त्रास देता आणि मग शिंदेसाहेबांना स्पष्टीकरण द्यावं लागतं. म्हणून आमच्या फडणवीस साहेबांनी काय करावं, कुठे काम करावं हे बोलण्याइतके आपण मोठे नाही आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांचं काम व्यवस्थितरित्या करु द्यात. उगाच काहीतरी बडबडून संजय राऊतसारख्या लायकी नसलेल्या माणसाला फुलटॉस देऊ नका, हा सल्ला नितेश राणे यांनी मित्रपक्षाच्या सहकार्‍यांना दिला.



उबाठा सेनेच्या कोर्टातील याचिका आधी मागे घ्या...


आज सकाळी त्यांनी हाही उल्लेख केला की आज पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर होतील, तशा महापालिकेच्या निवडणुकाही आयोगाने जाहीर कराव्यात. पण त्यासाठी तुमच्यासारख्या अनाडी माणसाला मी सांगेन की कोर्टामध्ये उबाठा सेनेच्या ज्या काही याचिका आहेत, त्या आधी मागे घ्या. मग महापालिकेच्या निवडणुका आयोग लगेच लावेल.



...अशा निवडणुका जिंकता येत नाहीत


रायगडमधून ठाकरे गटाने आपला उमेदवार उभा केला आहे याबद्दल पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर नितेश राणे म्हणाले, की त्यांनी कितीही उमेदवारी जाहीर केल्या तरी तिथे आमच्या महायुतीचाच खासदार निवडून येणार, स्वतःच निवडणुका जाहीर करुन, उमेदवारी जाहीर करुन निवडणुका जिंकता येत नाहीत, एवढंच मी सांगेन.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Deputy Collectors : राज्यातील ५१ तहसीलदार होणार उपजिल्हाधिकारी

महसूल विभागात हालचाली; 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी हुकणार? मुंबई :

Mankhurd : मानखुर्द येथील सरकारी जमिनीवरील बाराशे अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा, तब्बल अकरा एकर जमीन अतिक्रमणमुक्त उपनगरचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश

निष्कासित जागांवर विधायक उपक्रम, नागरिकांसाठी उभारणार अत्याधुनिक 'विज्ञानपार्क' मुंबई

ST Buses Tickets Rate : उन्हाळ्यात प्रवाशांना झटका; ST तिकिट दरात वाढ जाहीर

मुंबई : उन्हाळी सुट्टी सुरु झाली आहे आणि प्रत्येकजण आपल्या गावी किंवा बाहेरगावी जाण्यासाठी वेगवेगळ्या

BMC News : पाणी साचणाऱ्या ठिकाणांपासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले निर्देश मुंबईतील मिठी नदीसह नाल्यांची भिडे यांनी

Png And Lpg Gas Cylinder : PNG असेल तर LPG होणार बंद? 1 जुलैपासून या नव्या नियमांची होणार अंमलबजावणी

मुंबई : घरगुती गॅस वापराबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वाचे बदल लागू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत

Ajit Pawar : अजित पवारांच्या निधनावर 'या' प्रसिद्ध युट्युबरने केले असे काही की थेट झाली जेल वारी

मुंबई : २८ जानेवारी २०२६ महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला. बारामतीमध्ये एका विमानाचा अपघात झाला आणि संपूर्ण