Nitesh Rane : संजय राऊतची ग्रामसेवक आणि पोलीस पाटील बनायची लायकी नाही

शिवसेनेच्या आमदारांना माझा सल्ला आहे की...


आमदार नितेश राणे यांनी सुनावले खडे बोल


मुंबई : उबाठाचे (Ubatha) मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्रातून मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांच्यावर सातत्याने टीका करण्यात येते. महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्यासाठी काम करणार्‍या महायुती (Mahayuti) सरकारबद्दल असं छापून आणणार्‍या सामनाच्या संपादकांना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी चांगलेच खडसावले आहे. आजच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या लायकीवर भाष्य करणार्‍या उबाठाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना नितेश राणे यांनी त्यांचीच लायकी दाखवून दिली.


नितेश राणे म्हणाले, सामना वर्तमानपत्रात आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची कॅपेसिटी आणि लायकी यावर लिहिलेलं आहे. पण खरं तर रश्मी ठाकरेंना सामनाचे संपादक बनवून, संजय राजाराम राऊतची लायकी काढली, असं आम्ही म्हणायचं का? ग्रामसेवक आणि पोलीस पाटील बनायची लायकी नसलेला संजय राजाराम राऊत २०१९ ला मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघत होता. शरद पवार आपलेच नाव चालवणार म्हणून आमदारांना फोन करायला लागला पण याच्या लायकी प्रमाणे २ ते ३ पेक्षा जास्त आमदार याच्या बैठकीला जमलेच नाहीत, हीच याची लायकी आहे, असं नितेश राणे म्हणाले.


राजाराम राऊत यांच्या मुलाला म्हणजे संजयचा बंधू सुनिल राऊत याची उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना लायकी ओळखली आणि म्हणून मविआ सरकारच्या मंत्रिमंडळात संजयने एवढा थयथयाट करुनही सुनिलला साधं राज्यमंत्री पण बनवलं नाही. पण राजाराम राऊत यांच्या कुटुंबियांमध्ये कॅपेसिटी आहे, हे मानलं पाहिजे. ती कॅपेसिटी आहे गरिबांची खिचडी चोरण्यात. कारण अख्ख्या कुटुंबांचं नाव खिचडी घोटाळ्यात आलं आहे. त्यामुळे तुझी आणि तुझ्या मालकाची आधी लायकी, कॅपेसिटी बघ आणि मग फडणवीस साहेबांबद्दल बोल, असे खडे बोल नितेश राणे यांनी सुनावले.



शिवसेनेच्या आमदारांना माझा सल्ला आहे की...


आमचा मित्रपक्ष शिवसेनेच्या आमदारांना मी सांगेन की तुम्ही शिंदेसाहेबांना त्रास देणार याला काही मर्यादा आहेत. कधी अॅडच्या निमित्ताने तर कधी काही वक्तव्यं करुन त्यांना त्रास देता आणि मग शिंदेसाहेबांना स्पष्टीकरण द्यावं लागतं. म्हणून आमच्या फडणवीस साहेबांनी काय करावं, कुठे काम करावं हे बोलण्याइतके आपण मोठे नाही आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांचं काम व्यवस्थितरित्या करु द्यात. उगाच काहीतरी बडबडून संजय राऊतसारख्या लायकी नसलेल्या माणसाला फुलटॉस देऊ नका, हा सल्ला नितेश राणे यांनी मित्रपक्षाच्या सहकार्‍यांना दिला.



उबाठा सेनेच्या कोर्टातील याचिका आधी मागे घ्या...


आज सकाळी त्यांनी हाही उल्लेख केला की आज पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर होतील, तशा महापालिकेच्या निवडणुकाही आयोगाने जाहीर कराव्यात. पण त्यासाठी तुमच्यासारख्या अनाडी माणसाला मी सांगेन की कोर्टामध्ये उबाठा सेनेच्या ज्या काही याचिका आहेत, त्या आधी मागे घ्या. मग महापालिकेच्या निवडणुका आयोग लगेच लावेल.



...अशा निवडणुका जिंकता येत नाहीत


रायगडमधून ठाकरे गटाने आपला उमेदवार उभा केला आहे याबद्दल पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर नितेश राणे म्हणाले, की त्यांनी कितीही उमेदवारी जाहीर केल्या तरी तिथे आमच्या महायुतीचाच खासदार निवडून येणार, स्वतःच निवडणुका जाहीर करुन, उमेदवारी जाहीर करुन निवडणुका जिंकता येत नाहीत, एवढंच मी सांगेन.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

२६ जानेवारीपासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सेवांचा विस्तार; दररोजसाठी वाढणार इतक्या फेऱ्या

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. २६ जानेवारी २०२६ पासून पश्चिम

राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल — उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ संपन्न विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या

मनपा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकल्यानंतर २४ तासांच्या आत मंत्रिमंडळाची बैठक, झाले महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाला. या निकालानुसार

44-Hour Water Block : मुंबईतील धारावीसह पूर्व आणि पश्चिम उपनगर येत्या मंगळवारपासून ४४ तासांचा पाणी ब्लॉक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई : महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या

Nitesh Rane : 'हा' तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा!"- महायुतीच्या विजयानंतर नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मिळवलेल्या

पुण्यात शिवसेना शून्यावर बाद !

मुंबई : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये केवळ १५ जागा भाजपने शिंदेसेनेला दिल्या होत्या.