Pune: पुण्यात घातपाताचा प्रयत्न, मात्र रेल्वेच्या सतर्कतेने धोका टळला

पुणे: पुण्याच्या चिंचवड ते आकुर्डी या रेल्वे रूळावरील घातपाताचा मोठा धोका टळला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानाने येथे होणारा मोठा अनर्थ टळला.


काही समाजकंटकांकडून या रेल्वे ट्रॅकवर मोठमोठे दगड ठेवण्यात आले होते. मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांनी अलर्ट होत हा प्रयत्न हाणून पाडला. रेल्वे प्रशासनाने हे दगड वेळीच हटवल्याने मोठा अपघात होण्यापासून रोखता आले.


रेल्वेचे कर्मचारी या रेल्वे ट्रॅकवर नेहमीची तपासणी करण्यासाठी आले होते. यावेळेस त्यांना रेल्वे ट्रॅकवर ठेवलेले मोठमोठे दगड दिसले. संध्याकाळी चार वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यांनी तातडीने ही बाब वरिष्ठांस सांगितली. दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने मोठा अनर्थ होण्यापासून रोखता आले.


काही दिवसांपूर्वी अशीच घटना वंदे भारत एक्सप्रेससोबत राजस्थानातील भिलवाडाजवळ घडली होती.या वंदे भारत एक्सप्रेस मार्गावरील रूळावर मोठमोठे दगड तसेच लोखंडी गज ठेवण्यात आले होते. याद्वारे अपघात घडवण्याचा मोठा कट होता. मात्र लोकोपायलटने वेळीच सतर्कता दाखवल्याने हा अनर्थ टळला.

Comments
Add Comment

Dhule-Solapur highway : भरधाव कारने दुचाकीला उडवले; १९ वर्षीय तरुण गंभीर जखमी

आडूळ (ता. पैठण): धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडूळ फाटा येथे बुधवारी (दि. १७) दुपारी भरधाव कारने दुचाकीला

Mumbai-Pune Expressway : 'मिसिंग लिंक'जवळ भीषण साखळी अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

लोणी काळभोर/बोरघाट: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या आणि नुकत्याच सुरू झालेल्या 'मिसिंग लिंक'

Ramdara Mandir : रामदरा शिवालयाचे गर्भगृह नूतनीकरण; १८ जुलैपर्यंत मंदिर भाविकांसाठी बंद

लोणी काळभोर (पुणे): पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय मंदिराच्या गर्भगृहाचे नूतनीकरण आणि

Pandharpur Crime : धक्कादायक! रेल्वे रुळांजवळ मृतदेह, तुटलेला पाय घराच्या दरवाज्यात टांगलेला अवस्थेत

पंढरपूर पोलिसांसमोर गूढ वाढले पंढरपूर : धावत्या रेल्वेची धडक बसून 24 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू  (Railway Accident Death)

Jalgaon : आरपीएफच्या सहाय्यक फौजदाराचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, अमळनेर रेल्वे स्थानकात खळबळ

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर रेल्वे स्थानकावर (Amalner Railway Station) सोमवारी मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. रेल्वे

Drinking Water Policy : ग्रामीण भागात शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी नवे धोरण; दरमहा 150 ते 400 रुपये पाणीपट्टी आकारणार

मुंबई : ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ, निर्जंतुक आणि शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य