मुंबई : मुंबईतील गोरेगांवसारख्या गजबजलेल्या ठिकाणी आज पहाटे ३च्या सुमारास आगीची भीषण (Goregaon fire) दुर्घटना घडली. यातील मृतांचा आकडा वाढून ८ वर पोहोचला आहे, तर ५१ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ३० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. या भीषण आगीत ३० पेक्षा अधिक दुचाकी आणि ४ कार जळून खाक झाल्या आहेत. तसेच तळमजल्यावरील काही दुकानेदेखील जळून खाक झाली आहेत. या भीषण आगीमुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन केंद्र तसेच राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विट करत गोरेगांव आग दुर्घटनेविषयी हळहळ व्यक्त केली. त्यांनी लिहिलं आहे, मुंबईतील गोरेगावमध्ये झालेल्या आगीच्या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांप्रती मला दुःख झालं आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना आहेत. जखमींनी लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. केंद्र सरकारकडून त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना ५० हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे.
राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीदेखील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींच्या उपचारांचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार आहे. तसंच आपल्या ट्विटमध्ये मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली : आज मला एका गंभीर विषयाकडे तुमचे आणि देशवासीयांचे लक्ष वेधायचे आहे. काल…
कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी लाभार्थींची कसरत! अर्ज करण्यासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत मुदत, दोन अटी केल्या शिथिल…
बार्बाडोस : आदरणीय नरेंद्र मोदी सर, तुमचे शब्द आणि पाठिंबा यासाठी तुमचे खूप खूप आभार.…
जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, वेतन व शैक्षणिक पात्रता मुंबई : तरुणांसाठी भरघोस पगारासह सरकारी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला मुंबई : 'विधीमंडळ लोकशाहीचा प्रमुख स्तंभ आहे. या सभागृहाचा…
हाथरस : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी होऊन भीषण दुर्घटना घडली असून यामध्ये १२२ जणांचा…