Goregaon Fire Accident : गोरेगांव आग दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान मोदींकडून मदत जाहीर...

ट्विटद्वारे व्यक्त केला शोक


मुंबई : मुंबईतील गोरेगांवसारख्या गजबजलेल्या ठिकाणी आज पहाटे ३च्या सुमारास आगीची भीषण (Goregaon fire) दुर्घटना घडली. यातील मृतांचा आकडा वाढून ८ वर पोहोचला आहे, तर ५१ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ३० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. या भीषण आगीत ३० पेक्षा अधिक दुचाकी आणि ४ कार जळून खाक झाल्या आहेत. तसेच तळमजल्यावरील काही दुकानेदेखील जळून खाक झाली आहेत. या भीषण आगीमुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन केंद्र तसेच राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विट करत गोरेगांव आग दुर्घटनेविषयी हळहळ व्यक्त केली. त्यांनी लिहिलं आहे, मुंबईतील गोरेगावमध्ये झालेल्या आगीच्या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांप्रती मला दुःख झालं आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना आहेत. जखमींनी लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. केंद्र सरकारकडून त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना ५० हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे.





राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीदेखील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींच्या उपचारांचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार आहे. तसंच आपल्या ट्विटमध्ये मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या