९व्या जी-२० संसदीय अध्यक्षांच्या शिखर परिषदेचे पंतप्रधानांच्या हस्ते मंगळवारी होणार उदघाटन

नवी दिल्ली : नवी दिल्लीत द्वारका येथे नव्याने बांधलेल्या भारत आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन केंद्रात (आयआयसीसी) १३ ते १४ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ९वी जी -२० संसदीय अध्यक्षांची शिखर परिषद (पी -२०) आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ ऑक्टोबर २०२३ रोजी शिखर परिषदेचे उद्घाटन करणार आहेत.


जी-२० देशांव्यतिरिक्त, अन्य १० देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था या शिखर परिषदेत सहभागी होतील आणि आतापर्यंत २६ राष्ट्राध्यक्ष १० उपराष्ट्राध्यक्ष, ०१ समिती अध्यक्ष आणि आयपीयू अध्यक्षांसह ५० संसद सदस्य आणि १४ महासचिवांनी या परिषदेत सहभागी होण्याविषयी संमती दिली आहे, अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. संपूर्ण आफ्रिकन संसदेचे अध्यक्ष प्रथमच भारतात होणाऱ्या पी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत, असे बिर्ला यांनी सांगितले.


'वसुधैव कुटुंबकम् - एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' या भावनेने, भारताचे उद्दिष्ट हे अधिक समावेशक, शांततापूर्ण आणि न्याय्य जगाच्या दिशेने जटील जागतिक समस्यांवर सहमती-आधारित उपाय प्रदान करण्याचे आहे, असे ओम बिर्ला यांनी यावेळी बोलताना सांगितले.


बिर्ला यांनी माहिती दिली की, पी-२० शिखर परिषदेदरम्यान शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेला गती देणे, शाश्वत ऊर्जा संक्रमण, महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आणि सार्वजनिक डिजिटल मंचाद्वारे लोकांच्या जीवनात परिवर्तन अशी चार उच्चस्तरीय सत्रे आयोजित केली जातील.


समता, सर्वसमावेशकता आणि शांतता यावर आधारित प्रमुख जागतिक आव्हानांवर उपाय प्रदान करण्यासाठी जी-२० सरकारांना आवाहन करणाऱ्या संयुक्त निवेदनाने शिखर परिषदेचा समारोप होईल, अशी माहिती बिर्ला यांनी दिली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन