Politics : मंत्री गावितांचे समर्थक दुखावले! पालकमंत्रीपदामुळे मंत्री अनिल पाटील यांची नंदुरबारच्या राजकारणात एन्ट्री

नंदुरबार : महाराष्ट्र शासनाने अचानक पालकमंत्री पदामध्ये फेरबदल घडवले. यामुळे नंदुरबार येथील राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांच्याकडे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले तर नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद मंत्री अनिल पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले. या फेरबदलामुळे डॉक्टर विजयकुमार गावित यांचे समर्थक नाराज झाले आहेत.


डॉक्टर विजयकुमार गावित हे नंदुरबार विधानसभेचे आमदार आहेत. एक वर्षांपूर्वी त्यांना आदिवासी विकास मंत्री पद मिळाले. त्या पाठोपाठ नंदुरबार जिल्हा पालकमंत्री पद देखील पर्यायाने त्यांच्याकडे आले होते. परंतु भारतीय जनता पार्टी, एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि राज्य सरकारमध्ये नव्याने सामील झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजितदादा गट या तीन पक्षात सत्ता पदांचा समतोल साधण्यासाठी सध्या कसरत चालली आहे. त्या परिणामातून नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद अमळनेर येथील राष्ट्रवादीचे आमदार तथा मंत्री अनिल पाटील यांना मिळाले आहे.


अनिल पाटील यांना नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले जाण्याची शक्यता एक महिन्यापूर्वीपासून वर्तवली जात होती. अजित दादा यांचा झालेला नंदुरबार दौरा आणि पाठोपाठ दोन वेळेस अनिल पाटील यांचे झालेले दौरे त्या चर्चेला कारणीभूत होते. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना आता भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. यापूर्वी देखील त्यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री पद भूषविले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

साडीच्या ऑफरमुळे महिलांची चेंगराचेंगरी , ३ महिला बेशुद्ध

छत्रपती संभजीनगर : सध्या छत्रपती संभजीनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एक रीलस्टार ची रील पाहून महिलांनी

Uday Samant : "ठाकरेंचा वचननामा म्हणजे केवळ आश्वासनांची खैरात!" मंत्री उदय सामंतांचा टोला

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी

१५ ते २५ जानेवारीदरम्यान पुणे रेल्वे प्रवासात बदल, कोणत्या गाड्या रद्द? जाणून घ्या

पुणे : रेल्वेने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे रेल्वे विभागाकडून दौंड–मनमाड

पौष पौर्णिमेनिमित्त खंडोबा मंदिराला शिखरी काठ्यांची देवभेट

जेजुरी : पौष पौर्णिमा हा खंडोबाचा लग्नसोहळा दिवस असतो. यानिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरावर आज रविवारी दुपारी

हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही; महाराष्ट्रात मराठीचा सन्मान वाढवला जाईल

मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, ती आपली ओळख आणि अस्तित्व “मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपली ओळख आहे, आपली

लातूरचे नवोदय विद्यालय हादरलं; वसतिगृहात विद्यार्थिनी आढळली मृतावस्थेत

लातूर : लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना