Politics : मंत्री गावितांचे समर्थक दुखावले! पालकमंत्रीपदामुळे मंत्री अनिल पाटील यांची नंदुरबारच्या राजकारणात एन्ट्री

नंदुरबार : महाराष्ट्र शासनाने अचानक पालकमंत्री पदामध्ये फेरबदल घडवले. यामुळे नंदुरबार येथील राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांच्याकडे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले तर नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद मंत्री अनिल पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले. या फेरबदलामुळे डॉक्टर विजयकुमार गावित यांचे समर्थक नाराज झाले आहेत.


डॉक्टर विजयकुमार गावित हे नंदुरबार विधानसभेचे आमदार आहेत. एक वर्षांपूर्वी त्यांना आदिवासी विकास मंत्री पद मिळाले. त्या पाठोपाठ नंदुरबार जिल्हा पालकमंत्री पद देखील पर्यायाने त्यांच्याकडे आले होते. परंतु भारतीय जनता पार्टी, एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि राज्य सरकारमध्ये नव्याने सामील झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजितदादा गट या तीन पक्षात सत्ता पदांचा समतोल साधण्यासाठी सध्या कसरत चालली आहे. त्या परिणामातून नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद अमळनेर येथील राष्ट्रवादीचे आमदार तथा मंत्री अनिल पाटील यांना मिळाले आहे.


अनिल पाटील यांना नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले जाण्याची शक्यता एक महिन्यापूर्वीपासून वर्तवली जात होती. अजित दादा यांचा झालेला नंदुरबार दौरा आणि पाठोपाठ दोन वेळेस अनिल पाटील यांचे झालेले दौरे त्या चर्चेला कारणीभूत होते. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना आता भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. यापूर्वी देखील त्यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री पद भूषविले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना