Kartiki Ekadashi : विठ्ठलाची महापूजा कोण करणार? फडणवीस की अजित पवार?

  145

यंदा कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेचा मान कोणाला मिळणार? मंदिर समितीपुढे पेच


पंढरपूर : कार्तिकी एकादशीला (Kartiki Ekadashi) पंढरपुरात (Pandharpur) उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा संपन्न होते. मात्र आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत. तेव्हा महापूजा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) की अजित पवार (Ajit Pawar) करणार असा पेच निर्माण झाला आहे. यामुळे आता हा गुंता सोडवण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती विधी आणि न्याय विभागाचा सल्ला घेणार आहे.


कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री व मानाच्या वारकरी दाम्पत्याच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. यंदा येत्या २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. त्याच्या तयारीसाठी मंदिर समितीची बैठक झाली. त्यात हा मान दोनपैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना द्यायचा यावर चर्चा करण्यात आली. पण कोणताही ठोस निर्णय झाला नाही.


गतवर्षी कातिर्की एकादशीची महापूजा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली. पण आता बदलत्या घटनाक्रमांतर्गत राज्याला अजित पवार हे आणखी एक उपमुख्यमंत्री लाभलेत. त्यामुळे मंदिर समितीपुढे कार्तिकी एकादशीच्या यंदाच्या पूजेला कोणत्या उपमुख्यमंत्र्याला बोलवायचे हा मोठा पेच निर्माण झाला आहे. एकाला बोलावले तर दुसरा नाराज होण्याची भीती आहे.


मंदिर समितीला पवार व फडणवीस हे दोन्ही उपमुख्यमंत्री तेवढेच मानाचे आहेत. त्यामुळे विधी व न्याय विभाग सूचना करेल त्या उपमुख्यमंत्रायाला कार्तिकी महापूजेचे निमंत्रण दिले जाईल, अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. त्यामुळे आता हे निमंत्रण कुणाला मिळणार हे विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या