Kartiki Ekadashi : विठ्ठलाची महापूजा कोण करणार? फडणवीस की अजित पवार?

यंदा कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेचा मान कोणाला मिळणार? मंदिर समितीपुढे पेच


पंढरपूर : कार्तिकी एकादशीला (Kartiki Ekadashi) पंढरपुरात (Pandharpur) उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा संपन्न होते. मात्र आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत. तेव्हा महापूजा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) की अजित पवार (Ajit Pawar) करणार असा पेच निर्माण झाला आहे. यामुळे आता हा गुंता सोडवण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती विधी आणि न्याय विभागाचा सल्ला घेणार आहे.


कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री व मानाच्या वारकरी दाम्पत्याच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. यंदा येत्या २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. त्याच्या तयारीसाठी मंदिर समितीची बैठक झाली. त्यात हा मान दोनपैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना द्यायचा यावर चर्चा करण्यात आली. पण कोणताही ठोस निर्णय झाला नाही.


गतवर्षी कातिर्की एकादशीची महापूजा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली. पण आता बदलत्या घटनाक्रमांतर्गत राज्याला अजित पवार हे आणखी एक उपमुख्यमंत्री लाभलेत. त्यामुळे मंदिर समितीपुढे कार्तिकी एकादशीच्या यंदाच्या पूजेला कोणत्या उपमुख्यमंत्र्याला बोलवायचे हा मोठा पेच निर्माण झाला आहे. एकाला बोलावले तर दुसरा नाराज होण्याची भीती आहे.


मंदिर समितीला पवार व फडणवीस हे दोन्ही उपमुख्यमंत्री तेवढेच मानाचे आहेत. त्यामुळे विधी व न्याय विभाग सूचना करेल त्या उपमुख्यमंत्रायाला कार्तिकी महापूजेचे निमंत्रण दिले जाईल, अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. त्यामुळे आता हे निमंत्रण कुणाला मिळणार हे विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार