Asian Games 2023: यशस्वी जयसवालने रचला इतिहास, आशियाई स्पर्धेतील भारताचा पहिला शतकवीर

  94

होंगझाऊ: आशियाई स्पर्धा २०२३मध्ये भारत आणि नेपाळ क्रिकेट संघ यांच्यात खेळवल्या जात असेल्या क्वार्टर फायनल सामन्यात भारताचा फलंदाज यशस्वी जायसवालने(yashasvi jaiswal) इतिहास रचला. आशियाई स्पर्धेत शतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. जायसवालने ४८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने हे शतक पूर्ण करताना ८ चौकार आणि ७ षटकार ठोकले.


जायसवालचे टी-२० आंतरराष्ट्रीयमधील हे पहिले शतक आहे. भारताचा हा फलंदाज पहिल्यापासूनच आक्रमक दिसला. त्याने ४९ चेंडूत १०० धावांची खेळी केली.


सलामीला उतरलेल्या यशस्वी जयसवालने कर्णधार ऋतुराज गायकवाडसह मैदानात उतरत जबरदस्त खेळाचा नमुना सादर केला. टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये यशस्वीने याआधी अर्धशतक ठोकले आहे. त्याने २०२३मध्ये खेळवण्यात आलेल्या आयपीएलमध्येही दोन शतके ठोकली होती.



आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा भाग आहे यशस्वी


जयसवालने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघात प्रतिनिधित्व केले आहे. २०२३च्या हंगामात १४ सामन्यात १४ डावात ४८.०८च्या स्ट्राईक रेटने ६२५ धावा केल्या होत्या.



आंतरराष्ट्रीय करिअरची चांगली सुरूवात


२१ वर्षीय जयसवालने कसोटी क्रिकेटद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. पहिल्याच मालिकेत त्याने शतक ठोकले होते. त्याने आतापर्यंत २ कसोटी सामने खेळले आहेत. कसोटीच्या ३ डावात त्याने ८८.६७च्या सरासरीने २६६ धावा केल्या. याशिवाय ६ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात जयसवालने ४६.४०च्या सरासरीने २३२ धावा केल्या आहेत.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार